RSS Centenary : द्वेष शिकवणारा धर्म हा धर्मच नाही - रवींद्र आंबेकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित परिसंवादात धर्माच्या चिकित्सेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचा असं रवींद्र आंबेकर का म्हणाले ?
X
True Religion धर्म हा माणसाला प्रेम, करुणा आणि समता शिकवणारा असावा, असे मत Ravindra Ambekar रवींद्र आंबेकर यांनी आरएसएसच्या शताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, ज्या religion धर्मात द्वेष (hatred) शिकवला जातो, तो खरा धर्मच नाही. “ज्या धर्मात द्वेष शिकवला जातो, जो धर्म इतरांना कमी लेखतो, त्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या धर्मांची सखोल चिकित्सा (critical analysis) केली. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशा प्रमुख धर्मांचा अभ्यास केला आणि त्यातील दोष दाखवले. शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण तो प्रेम, समता आणि तर्क यावर आधारित आहे. आंबेकर म्हणतात, “बाबासाहेबांनी सर्व धर्मांची चिकित्सा केली आणि नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून ज्या धर्मांना त्यांनी नाकारले, त्यांची चांगलीच चिकित्सा झाली आहे.”
ते पुढे म्हणतात, “धर्माने प्रेम शिकवावे, तेच खरे धर्माचे लक्षण आहे. द्वेष शिकवणारा धर्म हा धर्मच नाही.” या संदर्भात बाबासाहेबांची पुस्तके वाचण्याची गरज आहे. विशेषतः ‘Riddles in Hinduism’, ‘Philosophy of Hinduism’, ‘Buddha and His Dhamma’ यांसारखी पुस्तके धर्म समजून घेण्यासाठी आणि त्यातील अंधश्रद्धा, विषमता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
तसेच यावेळी रवींद्र आंबेकर यांनी सत्ता आणि पैसा आल्यानंतर व्यक्तीचा खरा स्वभाव कळतो असं भाष्य करत त्यांनी काही संघटना आणि पक्षांनी आत्मपरिक्षण करायला पाहिजे सांगितलं. सत्ता आणि पैसा आल्यानंतर त्यांचा स्वभाव कसा झाला आहे. काँग्रेसमुक्त म्हणत म्हणत काँग्रेसयुक्त झालेली विचारधारा ही काय विचारधारा आहे का ? की अविचार आहे, संधीसाधूपणा आहे की धृतपणा आहे? असा सवाल ही केला.
धर्म समजून घ्यायचा असेल, त्यातील चांगले-वाईट ओळखायचे असेल आणि खऱ्या अर्थाने समतेचा आणि प्रेमाचा मार्ग शोधायचा असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके अवश्य वाचा. त्यांच्या लेखनातून धर्माची खरी चिकित्सा होते आणि माणसाला खऱ्या मुक्तीचा मार्ग दिसतो.
पाहा हा व्हिडिओ






