Future Direction of RSS : संघाला नेमकं करायचंय तरी काय ?
शिस्तबद्ध, संस्कार अशी संघाची बतावणी करताना तुमच्या देहबोलीत आवेश का दिसतो ? वाचा ‘संघाची पुढची दिशा व आव्हाने’ या परिसंवादावर प्रियंका आव्हाड यांचा लेख
X
Rashtriya Swayamsevak Sangh “आपण कसं वागतो हे आपल्यापेक्षा आपल्याला समोरून बघणाऱ्या व्यक्तीला अधिक उत्तमपद्धतीने समजते.” हे वाक्य सांगावस वाटलं कारण आठवडाभरापूर्वी BJP Avadhoot Wagh भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि उद्योजक अवधूत वाघ यांनी लिहिलेल्या जयोस्तुते या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतल्या पु.ल. देशपांडे कला अकादमी P.L. Deshpande Kala Akademi येथे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने यावेळी ‘संघाची पुढची दिशा व आव्हाने’ यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात MaxMaharashtra मॅक्स महाराष्ट्रचे Ravindra Ambekar संपादक रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ पत्रकार Jatin Desai जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे आणि मृणालिनी नानिवडेकर वक्ते म्हणून होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन स्वप्नील सावरकर करत होते.
Sangh future direction संघाची दिशा आणि आव्हानं यावर पहिला प्रश्न रवींद्र आंबेकर यांना विचारला गेला असता त्यांना ज्ञात असलेल्या संघाची चिकित्सा त्यांनी आपल्या शब्दात करण्याआधी “मी संघाचा फॉलोअर नाही, मी संघाच्या शाखेत कधी गेलो नाही, मी नेहमी संघाचा चिकित्सक राहिलेलो आहे” असं त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या भूमिकेतून मी जेव्हा बघतो त्यावेळी १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या संघटनेच्या विचारसरणीचे समर्थन करण्याऐवजी त्याकडे मी चिकित्सिकपद्धतीने पाहतो. संघाला आता करायचं काय आहे? तुम्ही थोड ब्रेक घ्या, उसंत घ्या, श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का ? तुम्हाला जे करायचं आहे ते होतय का ? तुम्ही जिकडे जाऊ पाहताय तिकडे जाताय का ? आणि ज्या विचारांच्या अनुषंगाने तुम्ही जी संस्था, विचार सुरु केला आहे नेमकं त्या मार्गावर तुम्ही आहात का ? मी संस्था, संघटना, विचार, नेता याकडे पाहताना दोन निकषावर पाहतो ते म्हणजे त्यांचा शिष्य कोण आणि दुसरं म्हणजे त्यांचा गुरु कोण ? जर आपण संघाचा शिष्य म्हणून बजरंग दलाला पाहिलं तर त्यांचे चिकित्सा झाली पाहिजे ते झालं की संघाचीही चिकित्सा होईल ? जर गुरु म्हणून आपण ज्यांनी संघ स्थापन केला त्यांना पाहणार असू तर संघ, विचार नेणाऱ्या त्यांच्या संघटना, राजकीय संस्था असेल तर त्यांच्या बॅनर्सवर,पोस्टरवर हे नेते का नाहीत ? का बाहेरून आणलेले नेते आहेत ? का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा वाटतो ? का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा लागतो ? तुमच्या विचारधारेच्या चौकटीतील फोटो का लावता येत नाही ? यावरून याला आपण हा संधीसाधूपणा आहे की धूर्तपणा आहे ? वैचारिक गोंधळ, इनोसन्स की धृतपणा आहे ? या सगळ्या टप्प्यातून आपण संघाकडे पाहिलं पाहिजे. तुमची जी विचारधारा आहे त्यावर चालण्याऐवजी जे ट्रेडिंग दिसतयं त्यावर आपली संस्था पुढे करायची याला काय म्हणायचं, असा सवाल रवींद्र आंबेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
संघाचं आकलन करताना रवीद्र आंबेकर यांच्या मांडणवीर किरण शेलार यांनी अपेक्षेप्रमाणेच आक्षेप घेतला. या परिसंवादात एकूण १ पैकी ३ असं चित्र पाहायला मिळालेलं असताना मी केलेले निरीक्षण मला या ठिकाणी नोंदवावे वाटते. परिसंवादाच्या सुरुवातीलाच रवींद्र आंबेकर यांची ओळख स्वप्नील सावरकरांनी journalist who covered the Sangh “संघाला कव्हर केलेला पत्रकार” I am a journalist who lived the Sangh. म्हणून केला. हाच धागा पुढे धरत किरण शेलार यांनी रवीजींची मांडणी चुकीची असल्याचं बोलत “मी संघ जगलेला पत्रकार आहे.” असं म्हटलं. बरं इथेच सुस्पष्टतेचा अभाव दिसतो. संघ जगलेला पत्रकार आणि संघाचं निरीक्षण करणारा पत्रकार… दोघेही पत्रकार, वस्तू एकच परंतु दोघांचे चष्मे वेगळे मानसिकता वेगळ्या आहे. बरं परिसंवादाचा विषय काय होता संघाची दिशा, आव्हानं यावर संघ जगलेले पत्रकार आपल्या चष्म्यातून संघाप्रती जिव्हाळा आणि संघचं कसा बरोबर हे सांगण्यात वेळ घालवत होते. त्याऐवजी त्यांनी संघाला आणखी काय करता येईल यावर सकारात्मक भाष्य केलं असतं तर अधिक उत्तम झालं असतं. मात्र ते रवींद्र आंबेकर यांनी केलेल्या मांडणीला विरोध करत बसले. आणि विषयचं भरकटला. या सगळ्या परिसंवादात मृणालिनी नानिवडेकर यांनी संवादाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या ठिकाणी एखादा विचारधारेला चिकित्सपणे बघा अस सांगत असताना तुम्ही त्यांची ट्रायल घेऊ नका असं परखडपणे सांगितलं. गांधीवादी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनीही आपली मांडणी सौम्य पद्धतीने ठेवत महिला आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. त्यालाही संघ जगलेल्या पत्रकारांकडून विरोध झाला. पुरुषांची संघटना म्हटल्याचा राग प्रकर्षाने जाणवला. संघाच्या विचारधारेवर चालणारे पत्रकार आपली मांडणी न करता विरोध करताना त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून द्वेषचं बाहेर पडत होता. जेव्हा तुम्ही असा परिसंवाद आयोजित करता तेव्हा तुम्ही एकतर संघातून बाहेर पडलेल्या पत्रकारांनाही आमंत्रित करायला हवं होतं.. का त्यांनी संघ सोडला.. वगैरे.. शिस्तबद्ध, संस्कारांची संघाची बतावणी करताना तुमच्या देहबोलीत आवेश का दिसतो ? असा सवाल मला किरण शेलार आणि प्रसाद काथे यांना विचारला आवडेल ? खर तर ही चर्चा दिशा न दाखवता संघाची दशा दाखवणारी वाटली. राहिला विषय रवींद्र आंबेकर यांच्या मांडणीचा तर तो गोलगोल नसून गुरु आणि शिष्याच्या निकषावर चिकित्सा करणारा होता. एखाद्या संघटनेचं किंवा संस्थेचे मूल्यमापन करून पुढची दिशा ठरवली जाते, आणि आव्हानांना तसं सामोरे जाता येत… या पार्श्वभूमीवर आंबेकरांनी मांडणी केली. कसं असतं आपल्यात कुठ कमी आहे हे तुम्ही सांगा असं म्हणायचं नंतर कुणी सांगायला सुरुवात केली की, त्याचा विरोध करायचा ही कसली संघाची परिभाषा… या चर्चेत सातत्याने लोकशाही शब्दाचा उल्लेख येत होता…या शब्दाचा आड आपली पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु होता, जसं देशाच्या राजकारणात सुरु आहे. संघाच्या व्यासपीठावर democracy लोकशाहीचे समर्थन करताना हिंदू धर्माची एकांगी बाजू कट्टरतेनं मांडताना संघाची मंडळी दिसली. या परिसंवादावर अनेक अंगांनी भाष्य करता येईल.
वैचारिक द्रारिद्याचे प्रदर्शन या हेडलाईन खाली प्रफुल्ल फडके यांनी या परिसंवादाची बिटवीन द लाईन्स या मथळ्याखाली परिसंवादाविषयी भाष्य केलं आहे. यावर बोलताना परिसंवादासाठी वक्ते चुकीचे निवडले हे काही प्रमाणात मान्य जरी केलं तरी मला असं वाटतं ज्यांनी संघातून एक्झिट घेऊन खुलेआम संघाचे टीकाकार झाले त्यांना का बोलवण्यात आलं नाही. दुसर असं की डावे वक्ते अभ्यास करुन आले नाही म्हणणं जरा चुकीचे आणि अतियोशक्तीचे वाटते. ज्यांची जी विचारधारा त्यानुसार त्यांनी संघाची criticism चिकित्सा केली. हे वैचारिक द्रारिद्र्य संघाचचं असावं ज्यांना वक्त्यांची निवड कळली नाही किंवा जे आले त्यांची मांडणी समजली नाही.
Ravindra Ambekar, Ravindra Ambekar, Jatin Desai, Kiran Shelar, Prasad Kathe, Mrinalini Nanivadekar, Swapnil Savarkar






