आर्थिक मंदीचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम - मनमोहन सिंह
Max Maharashtra | 17 Oct 2019 9:15 AM GMT
X
X
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत देशातील आर्थिक स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. देशातील या मंदीचा महाराष्ट्रासारख्या राज्यावर मोठा परिणाम झाला असल्याचं सिंह यांनी सांगितलं. सध्या देशातील तिसरा व्यक्ती बेरोजगार आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं सांगत महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे आता इतर राज्यात गुंतवणूक करत असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा
तर रोजगाराच्या क्षेत्रात मोठं संकट निर्माण होईल - मनमोहन सिंह
देश आर्थिक मंदीच्या दिशेने, सरकारने सुडाचं राजकारण बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा : मनमोहन सिंह
मागच्या महिन्यात देखील त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. आपण सध्या आर्थिक मंदीचा सामना करत असून ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेबाबत सरकारला जाणीव नसल्याची टीका त्यांनी केली होती.
Updated : 17 Oct 2019 9:15 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire