Home > News Update > नागरिकांनी धर्माच्या नावाने अधर्म करू नये – अन्वर राजन

नागरिकांनी धर्माच्या नावाने अधर्म करू नये – अन्वर राजन

नागरिकांनी धर्माच्या नावाने अधर्म करू नये – अन्वर राजन
X

अयोध्येतील रामजन्म भूमितील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा ऐतिहासीक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे घटनापीठाच्या अध्यक्षतेखाली झाली. या घटनापीठात न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे, न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचा या खंडपीठात समावेश आहे.

या निकाला संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

इतक्या वर्ष प्रलंबित असणाऱ्या अयोध्येचा निकाल आज आला आहे. दोन्ही पक्षांचा समाधान करायचा न्यायालयाने प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावी असं न्यायालयाला सुद्धा वाटतंय. सर्वांनी या निकालाचा आदर केला पाहिजे. या निकालात काही त्रुटी असतील तर त्याची चर्चा संयमानी करायला हवी.

निकालाच स्वागत करताना आनंद असेल किंवा नाराजी असेल या दोनही गोष्टी संयमाने व्यक्त केल्या पाहिजेत, या देशाला आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभे करूयात असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी केले.

Updated : 9 Nov 2019 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top