तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टिम इंडीया सज्ज
Max Maharashtra | 18 Aug 2018 11:27 AM GMT
X
X
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. उद्यापासून तिसऱ्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. उद्यापासून सुरू होणारा सामना हा विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी चांगलाच अटीतटीचा ठरणार आहे. आतापर्यंत झालेल्या दोन कसोटी सामन्यात दिनेश कार्तिकला अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्याने या सामन्यात आपला काही खास ठसा उमटवला नव्हता. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांत ऋषभ पंतने तीन अर्धशतके ठोकली आहे. त्यामुळे टिम इंडीयामध्ये ऋषभ पंत कार्तिकची जागा घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Updated : 18 Aug 2018 11:27 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire