रिफायनरी प्रकल्पामुळे हापूस आंब्याचा व्यवसाय नष्ट होईल का?
तेजस बोरघरे | 2 April 2021 12:56 PM GMT
X
X
कोकणचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हापूस आंबा आणि कोकणाचं नातं वेगळंच आहे. आंबा बागायतदार,पर्यटन, मासेमारी यावरती कोकणातली अर्थव्यवस्था आधारलेली आहे. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे आंबा बागायतदार संजय राणे सांगतात " आंबा व्यवसाय आमचा आर्थिक कणा आहे , त्यावरती आम्ही आमची कुटुंबं चालवतो. निसर्गानं भरभरुन दिलयं,आम्ही त्याच्यावरच निर्भर आहोत. आम्ही त्यावरच जगतोय मग हे नाणार सारखे प्रकल्प इथे येतात आणि आमच्यावर सरकारी टांगती तलवार ठेवतात. कोकणात अनेक प्रकल्प बंद आहेत रिफायनरी प्रकल्प येऊन काय होणार. शासन आम्हाला फक्त गाजर दाखवतोय रोजगाराचे... आम्ही या रिफायनरी प्रकल्पामुळे एका दिवसात भूमिहीन होऊ, आम्ही जगायचं कसं" असा प्रश्न संजय राणेंसारख्या हजारो बागायतदारांनसमोर पडला आहे. पाहा नाणारहून Tejas Borghare यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
Updated : 2 April 2021 12:56 PM GMT
Tags: nanar refinary
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire