रस्ता नाही तर मतदानही नाही
Max Maharashtra | 18 April 2019 11:59 AM GMT
X
X
वारंवार मागणी करूनही रस्त्याची समस्या न सोडवल्यानं संतापलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याची घटना मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघात घडलीय.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील फुलारवाडी या गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाकडून हा बहिष्कार मागे घेण्यासाठी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
मात्र, आपल्या मागणीवर ठाम असलेले ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठामच राहिले. या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी खालिद शेख यांनी.
Updated : 18 April 2019 11:59 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire