ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची मॅक्समहाराष्ट्रशी Exclusive बातचीत
X
X
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रद्द केले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नयनतारा सहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. मात्र आयोजकांवर राजकीय दबाव असल्यामुळे माझे येण रद्द केलं असावं असं खुद्द नयनतारा सहगल यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तसेच देशातील परिस्थिती बघता मी खूप दुखी आहे. हा देश फक्त हिंदूचा नाही सगळ्यांचा आहे. दुश्मनी आणि नफरत पसरवली जात आहे. तसेच यावेळी मराठी साहित्यिकांचे आभारही त्यांनी मानले आहे. मॅक्समहाराष्ट्रने नयनतारा सहगल यांची फोनवर केलेली Exclusive बातचीत...
https://youtu.be/43eQKxBGDk4
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल काय बोलल्या?
- देश राजकीय दबावाखाली आहे.
- देशात द्वेष पसरवला जात आहे
- हा फक्त हिंदूचा नाही तर सर्वांचा देश आहे
- देशाची परिस्थिती खराब आहे
- देशाची परिस्थिती बघून मी खूप दुखी आहे
- राजकीय दबावामुळे माझं नाव संमेलनातून रद्द करण्यात आले
- मराठी साहित्यिकांनी माझ्यासाठी संमेलनावर बहिष्कार टाकलाय.
- मराठी साहित्यिक माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्यामुळे मी त्यांचे आभार मानते.
Updated : 8 Jan 2019 6:58 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






