प्रज्ञासिंहच्या संतापजनक वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री गप्प कसे - काँग्रेस
X
X
२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह हिने संतापजनक वक्तव्यं केलंय. करकरे हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. मात्र, करकरे यांना आपल्या कर्माची फळं मिळालीत, असं संतापजनक वक्तव्यं प्रज्ञासिंहने केलंय. यासंदर्भात भाजपनं साध्वी प्रज्ञासिंहला तात्काळ निलंबित करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय. करकरे यांच्याविषयी संतापजनक वक्तव्य करूनही फडणवीस गप्प का असा सवालही सावंत यांनी उपस्थित केलाय.
Updated : 19 April 2019 6:20 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






