ग्राऊंड रिपोर्ट: सामान्यांना सरकारचा वाढीव वीज बिलांचा शॉक
विलास आठवले | 29 Oct 2020 3:07 PM GMT
X
X
लॉकडाऊनच्या काळात सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे लाखो लोकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेकांना बिलांच्या मोठमोठ्या रकमा आल्याने छातीत धस्स झाले. पण एवढे महिले उलटूनही सरकारने अजूनही या लोकांना दिलासा दिलेला नाही. वीज कट होईल या भीतीने लोकांनी आपले दागिने विकून बिलं भरली आहेत.
गरिबांची तर या वााढीव वीज बिलांनी वाईट अवस्था केली आहे. २ लाईट एक पंखा असलेल्या घरांची वीज बिल ६१ हजार रुपये आले आहे. एवढं बिल कसे आले, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे यावर काय म्हणणे आहे, याचा शोध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा...
Updated : 29 Oct 2020 3:26 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire