Home > Max Political > सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल - हुसेन दलवाई

सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल - हुसेन दलवाई

सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल  - हुसेन दलवाई
X

सध्या देशात सुरू असलेला सावरकरवाद हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा असल्याचं मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी पुण्यात एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं आहे.

“देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. अनेक तरुणांचे रोजगार बुडाले आहेत. या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न दाखवणे आणि ते स्वप्न पूर्ण करून घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.” असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

“सरकार पडावे म्हणून कोणी पाण्यात देव बुडवून बसले असतील तर त्यांची निराशा होईल. पण हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबध टोकाचे नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. आमच्या सरकारचे नावच महाराष्ट्र विकास आघाडी आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच आमचे सरकार झाले आहे.“ असा विश्वास हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/811822555905125/

Updated : 15 Dec 2019 5:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top