काहीही करा, पण जनावरं जगवा - शरद पवार
X
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८० तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे आज जाहीर केले. यावर महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती नाही तर, दुष्काळच असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेवर पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केले…. पाहा काय म्हणाले….
दुष्काळावर काय म्हणाले शरद पवार?
- मी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जाऊन आलो जी परिस्थिती दिसतेय ती भयानक आहे
- राज्यसरकाने तातडीने यावर उपाय केले पाहीजेत
- यावेळी दुष्काळचं आहे तातडीने उपाय केले पाहीजेत
- छावण्यांची उभारणी केली पाहीजे
- अशी स्थिती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकार मदत करते मात्र याबतीत काही दिसत नाही
- काहीही करा पण चारा द्या, जनावरांना जगवा
- जलयुक्त शिवार हे शास्त्रपद्धतीने नव्हते कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले
https://youtu.be/QrkHmGTT5dg