अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होणार?
Max Maharashtra | 28 Jan 2018 3:50 PM GMT
X
X
अहमदनगर: राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच विभाजन करणार असल्याचा दावा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली जात होती. नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ जास्त असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामे करणे अवघड होते. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन होणं गरजेचे असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिण आणि उत्तर असं द्विभाजन होण्याची शक्यता आहे.
Updated : 28 Jan 2018 3:50 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire