Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : दलित वस्ती आहे म्हणून पाणी मिळत नाही, स्थानिकांचा आरोप

Ground Report : दलित वस्ती आहे म्हणून पाणी मिळत नाही, स्थानिकांचा आरोप

Ground Report :  दलित वस्ती आहे म्हणून पाणी मिळत नाही, स्थानिकांचा आरोप
X

राज्यभरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झालेला आहे. केवळ ग्रामीण भागात नाही तर शहरी भागातही पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पण अनेक ठिकाणी केवळ दिरंगाईमुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. उल्हासनगर Ground Report : दलित वस्ती आहे म्हणून पाणी मिळत नाही, स्थानिकांचा आरोपसुभाष टेकडी परिसरात गेला आठवडाभर पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आम्ही दलित वस्तीत रहातो म्हणून आमच्यावर अन्याय होतो का? असा सवाल या नागरिकांनी केला आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट...

याच भागातील सुमारे एक लाख लोकवस्तीला पाणी पुरवठा करणाऱ्या 27 लाख लिटर आणि 12 लाख लिटरची क्षमता असणाऱ्या दोन टाक्या व पंप हाऊसची दूरवस्था झाल्याचा आरोपही इथल्या नागरिकांनी केला आहे. 12 लाख लिटरची नवीन टाकी तयार झाल्यापासून गळते आहे आणि 27 लाख लिटरच्या जुन्या टाकीच्या सर्व पिलर्सना तडे गेल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे दुर्घटना होण्याची भीतीही इथले नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत आम्ही महापालिका अधिकाऱ्यांना विचारले पण कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. केवळ "आम्ही आयुक्तांना कळवले आहे" असे मोघम उत्तर त्यांनी दिले आहे.

Updated : 20 May 2022 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top