शेतकऱ्यांना दिलासा 179 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री
Max Maharashtra | 23 Oct 2018 8:14 AM GMT
X
X
राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ परिस्तिथी निर्माण झाली असून यामध्ये 179 तालुक्यांचा समावेश आहे .ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येईल त्या तालुक्यांतील महसूल वसुली, शेतकऱ्यांचं वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार आहे . अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालं आहे. नाशिकमधील मांगीतुंगी इथं एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होळपणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे .त्याचबरोबर लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
Updated : 23 Oct 2018 8:14 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire