पश्चिम बंगालमध्ये कोण मारणार बाजी? निवडणूक रणनीतिकार प्रशांत कुमार म्हणाले....
X
भारतीय राजकारणात सध्या एकच सवाल उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? या संदर्भात पश्चिम बंगालच्या निवडणूकीत तृणमूल काँग्रेस पक्षाचे निवडणुकीतील रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले… ममता बॅनर्जी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत. "बंगालमध्ये काही ठिकाणी अँटी इन्कम्बसी आहे." ती ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नसून ती तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात आहे. या अँटी इन्कम्बसीवर पक्षाने गेल्या एका वर्षात मात करण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी या अजूनही बंगालच्या सर्वात लोकप्रिय नेत्या आहेत. आमचे सूत्र आहे की, किमान 45 टक्के मते आम्हाला घ्यावे लागतील. ज्याला बंगाल माहिती आहे, ते सांगतील की मोठ्या संख्येने महिला तृणमूल आणि ममतांच्या बाजूने पुढे येत आहेत. 8-10 वर्षांच्या अनुभवात मी ममता बॅनर्जी यांच्या इतकी लोकप्रिय महिला लीडर पाहिली नाही. माझे आकलन आहे की ममता बॅनर्जी मोठ्या फरकाने जिंकत आहेत". यावेळी त्यांनी भाजपला चांगल्या जागा मिळतील, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय असल्याचं भाकीत केलं आहे.






