Home > Max Political > गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची मागणी

गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची मागणी

गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची मागणी
X

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा करावा, पुराव्याची आवश्यकता पडली तर आम्ही पुरावे देऊ अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली असून मुख्यमंत्र्याचे गुंडासोबतचे फोटो दररोज समोर येत आहेत, हे गृहमंत्र्यांना दिसत नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सुरू असलेल्या या झुंडशाहीत दररोज घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांना अनुसरून संजय राऊत हे सतत राज्य सरकारवर हल्ला चढवत असल्याचं पहायला मिळतंय. गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं हे राज्य असल्याचा हल्लाबोल करत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्याचा सपाटाच लावलेला असून त्यांनी यांसंर्भात चक्क मुख्यमंत्र्यांवरच कारवाईची मागणी केली आहे.

कुटुंबाच्या वेदना गृहमंत्र्यांना जाणवत नाहीत का ?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेगला आहे.

फडणवीस म्हणाले होते की, "उद्या माझ्या गाडीखाली स्वानाचे पिल्लू जरी आले, तरी हे लोक मला राजीनामा मागतील." यावर राऊत म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हे कुत्र्याचे पिल्लू होते का ? दिवसाढवळ्या त्यांची हत्या करण्यात आली. आरोपीचा भाजपशी संबंध आहे याचे सर्व पुरावे आहेत. तरीही घोसाळकर यांच्या कुटुंबाच्या वेदना गृहमंत्र्यांना जाणवत नाहीत का ? त्याचबरोबर जेष्ठ पत्रकार निखील वागळेंवर देखील हल्ला झाला, ते कुत्र्याचे पिल्लू आहेत का ? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सरकार बदलल्यानंतर हिशोब होईल

खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे, सत्तेत असलेले हे लोक कोण आहेत ? माझा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सवाल आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र तुम्ही कुणाच्या हाती दिला आहे ? फडणवीस तिथे कुत्र्यासारखे झुकतात आणि इथे येऊन भुंकतात. मात्र सरकार बदलल्यानंतर त्यांचा हिशोब होईल, असं राऊतांनी म्हटले आहे.

Updated : 10 Feb 2024 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top