Home > Max Political > "फडणवीस तुम्ही राजकीय संन्यास घ्याच, किमान कटकटीतून महाराष्ट्राच्या जनतेची सुटका होईल"

"फडणवीस तुम्ही राजकीय संन्यास घ्याच, किमान कटकटीतून महाराष्ट्राच्या जनतेची सुटका होईल"

फडणवीस तुम्ही राजकीय संन्यास घ्याच, किमान कटकटीतून महाराष्ट्राच्या जनतेची सुटका होईल
X

मुबई : सत्ता आल्यावर ओबीसींच आरक्षण आणून दाखवलं नाही तर, राजकीय संन्यास घेईल,असं वक्तव्य करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी जोरदार हल्ला चढवला आहे.फडणवीस तुम्ही राजकीय संन्यास घ्याच, किमान कटकटीतून महाराष्ट्राच्या जनतेची सुटका होईल",असा खोचक टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस यांनी केलेल्या याच विधानाला उत्तर देतांना जाधव म्हणाले की,"फडणवीस यांना मी प्रार्थना करतो की, तुम्ही खरचं राजकीय संन्यास घ्या,तुम्ही जर राजकीय संन्यास घेतला तर तुमच्या कटकटीमुळे आणि त्रासामुळे महाराष्ट्राच्या जनतेची तरी किमान सुटका होईल असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव पाहू या..

Updated : 29 Jun 2021 4:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top