Home > Max Political > शेतकऱ्यांना मवाली म्हणणाऱ्या मिनाक्षी लेखी यांना राकेश टिकैत यांचं सडेतोड उत्तर

शेतकऱ्यांना मवाली म्हणणाऱ्या मिनाक्षी लेखी यांना राकेश टिकैत यांचं सडेतोड उत्तर

शेतकऱ्यांना मवाली म्हणणाऱ्या मिनाक्षी लेखी यांना राकेश टिकैत यांचं सडेतोड उत्तर
X

मिनाक्षी लेखी यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांना 'मवाली' म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात वातावरण पेटलं आहे. यावर भारतीय किसान यूनियन चे नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मवाली ते लोक आहेत जे काहीच करत नाही. शेतकऱ्यांसंदर्भात अशा पद्धतीने बोलणं ठीक नाही. आम्ही शेतकरी आहोत. मवाली नाही. शेतकरी अन्नदाता आहे.

अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.

मिनाक्षी लेखी यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना मवाल्यांशी केली आहे. अशा प्रकारे आंदोलन करणं अपराध असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 8 महिन्यांपासून शेतकरी दिल्ली येथे मोदी सरकारने केलेले 3 कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे.

पेगासस प्रकरणावरून संसदेत गोंधळ झाला. त्यानंतर मंत्री मीनाक्षी लेखी यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली.

त्यानंतर पत्रकारांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात मिनाक्षी लेखी यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी...

सर्वात अगोदर त्यांना शेतकरी म्हणणं बंद करा, कारण ते शेतकरी नाही. ते षड्यंत्री लोकांच्या हातावर चढलेले काही लोक आहेत. सतत शेतकऱ्यांच्या नावावर काही ना काही करत असतात. शेतकऱ्यांजवळ जंतर मंतर वर येऊन बसायला वेळ नाही. ते आपल्या शेतात काम करत आहेत. हे आडत्याची माणसं आहेत. त्यांना शेतकऱ्यांना फायदा व्हावा असं वाटत नाही. अशा प्रकारे आंदोलन करणं गुन्हा आहे. विरोधी पक्ष अशा गोष्टींना हवा देत आहे.

त्यानंतर दुसऱ्या एका प्रश्नात पत्रकारांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नाव घेतल्यानंतर मिनाक्षी लेखी यांनी तुम्ही पुन्हा एकदा त्यांना शेतकरी म्हटलं ते शेतकरी नाही. ते मवाली आहेत.

दरम्यान मिनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापलं असून कॉंग्रेसने मिनाक्षी लेखी यांचा राजीनामा मागितला आहे.

Updated : 22 July 2021 4:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top