Home > Max Political > Raigad Satara landslide: मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Raigad Satara landslide: मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Raigad Satara landslide: मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
X

मुंबई, दि. २३: राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

Updated : 23 July 2021 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top