महायुतीत ठिणगी, युतीत वितुष्ट येईल असे भाजपने देखील वागू नये
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Dec 2023 6:07 AM GMT
X
X
नवाब मलिकांच्या विधानसभेत येण्यावरुन महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे. महायुतीत वितुष्ट निर्माण होऊ नये याची काळजी भाजपने देखील घ्यायला हवी असा घरचा आहेर आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रच द्यायचे होते तर फोन करता आला असता, वॉट्सअॅपवर निरोप देखील पाठवता आला असता.राष्ट्रवादी ज्याप्रमाणे प्रोटोकॉल पाळते त्याचप्रमाणे भाजप, शिंदे गट यांनी देखील तो पाळायला हवा अशी प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना अमोल मिटकरी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत तसेच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे देखील सांगितले.
Updated : 8 Dec 2023 6:07 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire