Home > Max Political > अन्यायकारक केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार झालंय : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

अन्यायकारक केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार झालंय : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आता जनमत तयार झालं आहे. त्या जनमताला नेतृत्व मिळण्याची आवश्यकता होती. आणि निश्चितपणे शरद पवार साहेबांच्या सारखा नेत्याला, देशाच्या दुसऱ्या बाजूचे सरकारच्या विरोधात नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळत असेल तर हे आम्हाला अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

अन्यायकारक केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार झालंय : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
X

भारतातील कामगार शेतकरी यांच्यावर सध्याच्या भाजपच्या सरकारने अन्याय करण्याची भूमिका सुरू केली आहे. देश विकण्याची पुरेपूर व्यवस्था भाजप सरकारने चालू केली आहे. त्या सरकारच्या विरोधात आता जनमत तयार झाल आहे. त्या जनमताला नेतृत्व मिळण्याची आवश्यकता होती. अस सांगून पाटील पुढे म्हणाले, निश्चितपणे शरद पवार साहेबांच्या सारखा,

उत्तुंग आणि दीर्घ अनुभव असलेला नेता भारतामध्ये या सरकारच्या विरोधातल्या चुका मांडण्याचे काम निश्चितपणे करतील.सोनिया गांधी यांनी ही यापूर्वी सर्वाना एकत्रित घेऊन काम केलंय. या देशाच्या दुसऱ्या बाजूस सरकारच्या विरोधात नेतृत्व करण्याची जबाबदारी पवार साहेबांच्या वर येत असेल तर कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्हाला या बाबत अभिमान वाटत आहे, अस ही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.



Updated : 10 Dec 2020 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top