Home > Max Political > पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडणार? प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडणार? प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून रण पेटले आहे. त्यातच ही लढत शिवसेना विरुध्द भाजप अशी जरी दिसत असली तरी ही लढत भाजप विरुध्द राष्ट्रवादी रंगणार असल्याचे मत वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडणार? प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत
X

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. त्यातच भाजपने कोल्हापुरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत कोल्हापुरच्या दोन मल्लांमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यानी मोठे भाकीत व्यक्त केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहावा उमदेवार शिवसेनेचा पण आहे आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे.

धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे प्रत्यक्षात भाजप-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असं म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणं भाजपला सोपं जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. तर या घोडेबाजारासाठी आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल. मात्र महाराष्ट्राची जनता हे सगळं पाहतेय, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.



Updated : 4 Jun 2022 2:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top