भास्कर जाधव यांनी विरोधकांना पुन्हा सुनावले
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 July 2021 2:12 PM GMT
X
X
भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्यामुळे विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सध्या खूपच चर्चेत आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या आमदारांनी प्रतिरुप अधिवेशन घेतले. यावरुनही भास्कर जाधव यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांनाही जाधव यांनी फटकारले आणि आंदोलन करण्यापेक्षा चर्चेत सहभाग व्हा असे आवाहन केले. त्यानंतर चर्चे दरम्यान भास्कर जाधव यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन सरकारने भास्कर जाधव यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. जाधव यांनी आपण सुरक्षा घेत नाही, असे सांगितले. पण याबाबत सरकार जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल असे सांगितले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जाधव यांना सुरक्षा देणार असल्याची घोषणा केली आहे.
Updated : 6 July 2021 2:12 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire