जागावाटपावरून महायुतीत गडबड; त्यांना सत्तेची मस्ती, नाना पटोलेंचा हल्लाबोल
X
News Updates : महायुतीमध्ये जागावाटपावरून गडबड सुरू आहे. महाविकास आघाडीत कोणतीही गडबड नाही. आता तर महायुतीत भांडण सूरू झाले आहे. आगामी काळात खूपच भयानक परिस्थिती होणार आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान महायुतीत काय व्हायचं ते होईल, त्यांना सत्तेची मस्ती आहे. जनतेची प्रश्न वाऱ्यावर आहेत, धान्य खरेदी नाही, राज्यात पेपरफुटी सुरू आहे, सरकार त्यावर काहीच करत नाही, हुशार मुलांचं नुकसान सुरू आहे असं म्हणत नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे, तर महाविकास आघाडी योग्य वेळी जागा जाहीर करेल असेही ते म्हणाले.
आमच्याकडे मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी चांगले उमेदवार आहेत. सिने अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा, आणि अभिनेता राज बब्बर हे देखील आहेत, असं नाना पटवले माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले. त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीत राज बब्बर यांना देखील मैदानात उतरवू शकते. असं संकेत नाना पटोले यांनी दिलं.






