Home > Max Political > जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग: देवेंद्र फडणवीस

जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग: देवेंद्र फडणवीस

VIDEO: जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग: देवेंद्र फडणवीस

जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग: देवेंद्र फडणवीस
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचा इशारा देत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी जगभरातील काही देशांचे उदाहरण देत परिस्थिती किती गंभीर आहे आणि लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 



''युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. फ्रान्सने तिसर्यांआदा लॉकडाऊन लावला... पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले... हंगेरीत 'वर्क फ्रॉम होम'... पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती... पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज... ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठवण्यास मदत... पण, 2 लाख 20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांीना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यां्ना 800 युरोंपर्यंत मदत ! बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत... पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय... फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत... पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय..."



या टिकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देताना

 पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे .... आपले केंद्र सरकार काय देणार ... अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही ... बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं होतं. आव्हाडांच्या या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीउत्तर दिलं आहे.



''मला असं वाटतं जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातली एकमेव सरकार आहे. ज्यांनी कुठलीच मदत केली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरांमध्ये दिलं आहे. देशातील इतर राज्यांनी देखील पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैश्याचं पॅकेज तर दिलंच नाही. पण त्याच्या ऐवजी महाराष्ट्राने लोकांचे वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं याच्यावरच भर दिलेला आहे. म्हणजे संपुर्ण कोव्हीडमध्ये कुठलं एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे.''

असं म्हणत फडणवीसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.



काय म्हटलं होतं फडणवीस यांनी…


"होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची... युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा ! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. फ्रान्सने तिसर्यांआदा लॉकडाऊन लावला... पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले... हंगेरीत 'वर्क फ्रॉम होम'... पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती... पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज... ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठवण्यास मदत... पण, 2 लाख 20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांीना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यां्ना 800 युरोंपर्यंत मदत ! बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत... पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय... फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत... पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय..."

असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Updated : 3 April 2021 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top