Home > Max Political > भारतानंतर चीनची भुटानमध्ये घुसखोरी चार गाव वसवली! ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला कोण आळा घालणार?

भारतानंतर चीनची भुटानमध्ये घुसखोरी चार गाव वसवली! ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला कोण आळा घालणार?

China constructs another village near Arunachal, more in Bhutan, heliports along LAC

भारतानंतर चीनची भुटानमध्ये घुसखोरी चार गाव वसवली! ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला कोण आळा घालणार?
X

चीन आणि भारत यांच्यामधील सीमावाद थांबण्याचं नाव घेत नाही. त्याच दरम्यान आता चीन ने भूटान च्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. चीनने भूतानच्या परिसरात गेल्या एक वर्षात बांधकाम सुरु केले आहे. सॅटेलाइट फोटोनुसार, भूटानच्या 100 कि.मी. आत चीनने या भागात चार नवीन गावं वसवली आहेत.

ज्या ठिकाणी हे बांधकाम झालं आहे. हे एक वादग्रस्त ठिकाण असून ते डोकलाममध्ये येते. येथे 2017 मध्ये भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते आणि अनेक दिवस दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू होता. त्यानंतर चीनने येथे रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सैनिकांनी त्याला विरोध केला.

या गावाचं बांधकाम 2020 ते नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान झालं आहे. चीनने आता भूटानवर दबाव टाकला आहे.

@detresfa ने आपल्या ट्विटमध्ये हे फोटो ट्वीट केले आहे. हे फोटो ट्वीट करताना चीन च्या आक्रमक नीतिबाबत सवाल केला आहे.


डोकलाममध्ये चिनी सैन्याच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहे. 2017 च्या वादानंतरही चीन डोकलाममध्ये आपली स्थिती मजबूत करत असल्याचं वृत्त आहे.

आपल्या सीमा वाढवण्यात गुंतलेल्या चीनवर तिबेट, तैवानवर अवैध कब्जा केल्याचा आरोप आहे. चीन लडाख आणि अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा दावा करतो.

गलवान खोऱ्यात भारत चीन आमने सामने आले आहेत. विस्तारवादी चीन ला व्हिएतनाम, भारत, नेपाळ, भूतानची जमीन हवी आहे. गेल्या वर्षी चीन भूतानच्या सीमेच्या 2 किमीच्या आत घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

भूतानच्या भूमीवर चीनने केलेली ही नवीन बांधकामे भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारताचे केवळ भूतानशी मजबूत संबंध नाहीत तर भारत भूटान सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं देखील काम करतो. वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देश कोणतेही बांधकाम करणार नाही. असा चीन आणि भूतान यांच्यामध्ये परस्पर करार आहे. मात्र असे असूनही चीन कारर मानायला तयार नाही.

गेल्या काही महिन्यांत, चिनी सैन्याने गलवान व्हॅली, पॅंगॉन्ग त्सो, हॉट स्प्रिंग्स, डेमचोक, फाइव्ह फिंगर्समध्ये घुसखोरी करून लडाखमध्ये आपली पकड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. चीन सीमारेषेवर बांधकामे करत असल्याचं समजतंय. भारत सरकारने याप्रकरणी चीनला चोख उत्तर देण्याची मागणी विरोधक करत आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये घुसघोरी...

गेल्या काही वर्षामध्ये भारत आणि चीन या दोन देशामधील सीमावाद वाढलेला असताना चीन ने अरुणाचल प्रदेशातही भारतीय हद्दीत प्रवेश करून एक संपूर्ण गाव वसवले आहे. या गावात 100 घरं बांधली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

हे गाव पूर्णपणे भारताच्या हद्दीत वसलेले आहे. NDTV ने काही महिन्यांपूर्वी या गावात बांधलेल्या घरांची उपग्रह प्रतिमा देखील प्रसिद्ध केली होती.

यूएस संरक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की,

2020 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) ने भारत आणि चीनमधील भागात 100 घरे बांधली आहेत. हा भाग तिबेट मधील स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यान आहे. ही घरं LAC च्या पूर्वेकडील सेक्टरमधील भागात बांधण्यात आली आहेत.

भारत चीन सीमावाद

गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यानंतर लष्करी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण तरीही सीमा वाद पूर्णपणे मिटलेला नाही.

चीन आणि भारत यांच्यामधील वादाचे मुख्य कारण म्हणजे सीमावर्ती भागात चीनकडून सातत्याने पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही सीमाभागात सैनिकांसाठी आवश्यक सुविधा आणि चांगले रस्ते वाढवले आहेत.

गलवानमधील चकमकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर LAC चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एकीकडे, चीन सीमा विवादाचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचे नाटक करत आहे आणि दुसरीकडे LAC वर मोठ्या प्रमाणात बंकर, तोफखाना आणि लष्करी पायाभूत सुविधा तैनात करत असल्याचं उपग्रहांनी घेतलेल्या फोटोमधून समोर आलं आहे.

मोदी सरकार अडचणीत?

दरम्यान या गावाच्या बांधकामाबाबत बातम्या आल्या तेव्हाही प्रसारमाध्यमांनी आणि विरोधकांनी मोदी सरकारला याबाबत सवाल केला होता.

कुठं आहे हे गाव?

हे गाव अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर वसलेले आहे. 1962 च्या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या युद्धापूर्वी या नदीवर अनेक चकमकी झाल्या आहेत. हा भाग भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून विवादित आहे आणि लष्करी संघर्षाचे क्षेत्र आहे.

चीनचं बांधकाम...

चीनने या भागात एक छोटी लष्करी चौकी बांधली होती, पण 2020 मध्ये चीनने भारतीय हद्दीमध्ये संपूर्ण गाव वसवण्यास सुरुवात केली तसंच या भागात चीन रस्तेही बांधत आहे.

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या लष्करी आणि राजकीय चर्चेनंतरही LAC वर आपला दावा करण्यासाठी चीन अशी कारवाई करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात, ईस्टर्न आर्मीचे कमांडर इन चीफ मनोज पांडे म्हणाले होते की, चीन दोन हेतूने गावाचे निर्माण करत आहे. या गावात सर्वसामान्य लोक राहतील असं नाही तर या गावाचा वापर सैनिक करू शकतात. अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

चीन भारताच्या सीमेवर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात सतत बांधकाम करत आहे आणि तिबेटच्या प्रदेशातही अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे. तो येथे रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विणत आहे. अनेक गावं वसवत आहे.

Updated : 18 Nov 2021 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top