राज्यात अनेक ठिकाणी बोगस लसीकरण, फडणवीस यांचा आरोप...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 July 2021 10:51 AM GMT
X
X
कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने कंत्राटांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपने मंगळवारी विधिमंडळ परिसरात प्रतिरुप अधिवेशन भरवले. या ठिकाणी फडणवीस यांनी राज्यात बोगस लसीकरण झाले, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच पीक विमा कंपन्यांशी साटंलोटं करुन सरकारने शेतकऱ्यांचे फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
Updated : 6 July 2021 10:51 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire