Home > Max Political > भाजपात लवकरच गळती: जयंत पाटील

भाजपात लवकरच गळती: जयंत पाटील

भाजपात लवकरच गळती: जयंत पाटील
X

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल असं भाजप म्हणत आहे. मात्र, तसं होणार नाही. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणू द्या, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार, उलट भाजपातच लवकरच गळती लागणार आहे. त्यानंतर फडणवीस असं बोलणार नाहीत. अशी टीका जयंत पाटील यांनी केली. औरंगाबाद येथील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

तर महाविकास आघाडीतर्फे मराठवाडा पदवीधर मतदार संघात सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने काही बंडखोरांनी भरलेले अर्ज मागे घेतले जातील. तशी बोलणी सुरू आहे. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. असं वक्तव्य करत बच्चू कडू यांच्या प्रहरच्या वतीने दिली गेलेली उमेदवारी मागे घेतील असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.


Updated : 12 Nov 2020 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top