Home > News Update > शेतीच्या कामांसाठी सरकारने कर्ज उपलब्ध करुन द्यावे: प्रकाश आंबेडकर

शेतीच्या कामांसाठी सरकारने कर्ज उपलब्ध करुन द्यावे: प्रकाश आंबेडकर

शेतीच्या कामांसाठी सरकारने कर्ज उपलब्ध करुन द्यावे: प्रकाश आंबेडकर
X

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण मे महिना लॉक डाऊनमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हातात पैसा नसल्याने शेतीची कामं करता येत नाहीयेत. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पावसाळा आता तोंडावर आला असून शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मे महिन्यात शेतीची कामे उरकली नाही तर जूनमध्ये पेरणी करायला उशीर होतो. त्यात आता शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये आले तर गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत न बोलविता अधिकाऱ्यांनीच गावा गावात जाऊन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत. शिवाय आधीचे कर्ज आणि आताचे नवीन कर्ज विचारत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Updated : 4 May 2020 7:18 AM IST
Next Story
Share it
Top