Home > मॅक्स किसान > Monsoon2023 संपुर्ण आठवडा कोकणासह महाराष्ट्रात धोधो पाऊस ...

Monsoon2023 संपुर्ण आठवडा कोकणासह महाराष्ट्रात धोधो पाऊस ...

मान्सूनने वाटचाल सुरु केली असून कोकण पट्टीसह महाराष्ट्रात सर्वदूत येत्या आठवडाभर जोरदार ते अति- जोरदार आणि मध्यम पाऊस पडणार आहे.

Monsoon2023 संपुर्ण आठवडा कोकणासह महाराष्ट्रात धोधो पाऊस ...
X

तब्बल महीनाभर उशिरानं दाखल झालेल्या मान्सूनसाठी आता राज्यात प्रतिकुल परीस्थिती निर्माण झाली आहे. जुन महीन्याचा शेवटचा आठवडा मुंबई, ठाणे कोकण सह उर्वरीत महाराष्ट्रात धोधो पाऊस पडणार असून जुन महीन्याची सरासरी काही प्रमाण भरुन निघेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागानं रेंगाळलेला मान्सून २४ जूनपासून सक्रीय होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार वातावरणातील झालेला बदल यामुळं मान्सूनचा पाऊस बरसण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळं मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. राज्यात आज सकाळपासून मुंबई, ठाणे, चंद्रपूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.

काल चंद्रपूरमध्ये अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अंदाजानुसार जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. एकंदरीतच चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सिअस वर गेला असताना नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं देखील चंद्रपूरमध्ये मान्सून सक्रीय होईल आणि तिथून तो विदर्भात सक्रीय झाला आहे.

रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली होती. कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यात पाऊस बरसला. तर, रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी पाऊस पडला होता. साताऱ्यात आज ढगाळ वातावरण दिसून आलं. भारतीय हवामान विभागानं नाशिकमध्ये सोमवारपासून पाऊस सुरु होईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनसाठी अनुकूल बदल वातावरणात झाल्याचं म्हटलं आहे.

हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, शुक्रवार (ता.२३) पासून मान्सूनच्या बंगालच्या उपसागरातील शाखांनी झारखंड, बिहार काबीज करत विदर्भात प्रवेश केला आहे.कालपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात विभागानुसार कमी-अधिक तीव्रतेने, पावसाला सुरवात झाली आहे.कोकण विभागात मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित केरळ, कर्नाटक राज्यातील संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत शुक्रवार दि.२३ जूनपासुन पुढील आठवडाभर जोरदार ते अति- जोरदार पावसाची शक्यता आहे.विदर्भ विभागात सर्व १० जिल्ह्यात आज व उद्या दि. २३,२४(शुक्रवार, शनिवार) ला मध्यम तर परवा रविवार दि. २५ पासुन जोरदार पावसाची शक्यता आहे.



मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात कोकणातील अति-जोरदार पावसामुळे सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्रातील १० तर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ तर उद्या शनिवार दि.२४ जून पासुन मध्यम तर परवा रविवार दि २५ पासुन जोरदार पावसाची शक्यता ह्या क्षेत्रात जाणवते.

थोडक्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अंतर्गत भागातील वर्षाछायेच्या टापूत (नाशिक नगर पुणे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तर जळगाव छत्रपती संभाजानगर अहमदनगर, बीड, धाराशिव, सोलापूर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात) मात्र दोन दिवस पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी परवा रविवार दि.२५ पासुन तेथेही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मान्सून अजुनही त्याच्या वाटचालीतच म्हणजे पूर्व-मोसमी पावसाच्या वातावरणातुन मोसमी पावसाच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या संक्रमनीय काळात आहे. त्यामुळे प्रवेश केलेल्या भागाच्या आगमनात एक-दोन दिवस विजांचा कडकडाट व गडगडाटही वातावरणाचा अनुभव येतो.

त्यामुळे गोंधळून न जाता पाऊस मोसमी कि पूर्वमोसमी ह्याची शहानिशा न करता पाऊस होत आहे हे महत्वाचे समजावे. पाऊस झाला तर लगेच पेरणी करू नये.सर्व पार्श्वभूमीवर अपेक्षित चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी ६ जुलै नंतर पेरणीचा निर्णय योग्य ठरु शकतो असे त्यांनी सांगितले..

देशात उष्णतेची लाट लोप पावली आहे.महाराष्ट्रात विदर्भातही उष्णता-सदृश स्थितीही विरळली आहे. तरी सध्या दिवसाचे कमाल तापमान जरी ३ ते ४ डिग्रीने खालावले असले तरी ते विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात सध्याच्या काळातील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिकच असुन तेथे एकंदरीत ते ३८ ते ४० डिग्री दरम्यान असल्याचे जाणवते.

उत्तराखंडातील बद्री- केदार तसेच हिमाचल प्रदेशातील पर्यटकांना आजपासुन पुढील आठवडाभर गडगडाट, वीजा, गारासहित जोरदार ते अतिजोरदार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता जाणवते.

एकंदरीत हिमालयीन पर्यटनासाठी वातावरणीय दृष्ट्या सध्याचा ह्या आठवड्यातील काळ कदाचित गैरसोयीचा ठरु शकतो. पंढरीवारी वारकऱ्यांना परवा रविवार दि. २५ जून पासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यमुळे त्या पुढील ४-५ दिवस मात्र काहीसे गैरसोयीचे जाणवतील असेही माणिराव खुळे यांनी सांगितले असून 'बिपोरजॉय' वादळाचा जोर पूर्णपणे विरला

Updated : 24 Jun 2023 1:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top