Home > मॅक्स किसान > महाराष्ट्र दुष्काळाच्या वाटेवर

महाराष्ट्र दुष्काळाच्या वाटेवर

यंदाचे वर्ष मान्सूनने शेतकरी आणि नागरिकांची सपशेल निराशा केली असून अलिनो प्रभावामुळे अपेक्षित परिणाम झाला राज्यातील बहुतांश भागात कमी पावसामुळे खरीप वाया गेला आहे आगामी रब्बी साठी पाणी देखील उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने सावध राहण्याचे आवाहन ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या वाटेवर
X

महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण

1

"सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसुन पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे गुरुवार दि.७ सप्टेंबर पर्यन्त मुंबईसह कोकण व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.



2

मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे.






3

"तटस्थ ' भारत महासागरीय द्वि- ध्रुविता ' व (ii)कमकुवत का असेना पण सध्या अस्तित्वात असलेला पण शेष उर्वरित पावसाळी हंगामात विकसनाची शक्यता ठेवून असणारा ' एल-निनो ' आणि (iii)सध्या भारत विषववृत्तीय महासागरीय क्षेत्राच्या बाहेर भ्रमणित असलेला ' एमजेओ ' ( iv) खाली वर सरकणारा पण सध्या सरासरी जागा सोडून अधिक उत्तरेकडे सरकलेला पूर्व- पश्चिम ' मान्सूनचा आस '' (v) कमकुवत झालेली मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा (vi) ऐतिहासिकरित्या उदभवून गेलेला ऑगस्ट महिन्यातील ह्यावर्षीचा पावसाचा खण्ड ह्या सर्व ६ वातावरणीय प्रणाल्या चालु ऑगस्ट महिन्यातील पावसास प्रतिकूल ठरलेल्या आहेत.





अति उत्तरेत पाऊस कशामुळे?

4

ह्या उलट मात्र देशाच्या अतिउत्तरेकडे एकापाठोपाठ नियमितपणे येणारे ' पश्चिमी झंजावात ' व त्याचबरोबर उत्तरेकडे स्थलांतरित होणारा आणि अधिक काळ हिमालय पायथा समांतरित क्षेत्रात जाऊन बसलेला 'मान्सूनी आस ' ह्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात ह्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालून महापुराने जनजीवन विस्कळीत करून हिमालय पर्वतीय भू -क्षेत्रही त्याने चांगलेच खिळखिळे केले आहे. २ महिने तेथील पर्यटनही धोक्यात आणले आहे.





5

पावसाची अपेक्षा कशी करावी?

" जून, जुलै, ऑगस्ट ३ महिने एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतांनाही समाधानकारक पाऊस झाला नाही. तर मग आता व६ प्रणाल्यांचा सध्या ) असताना आणि त्यातही विशेषतः एलनिनो पॉझिटिव्ह असताना कोणत्या पावसाची अपेक्षा करावी?"





6

परतीचा मान्सूनही सांशक

" ह्या प्रतिकूलतेत, १ सप्टेंबर नंतर केंव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका ह्याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा ह्या ४ नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? म्हणूनच साशंकता वाटते.





7

आयोडी नकारात्मक

मग ह्या नकारात्मक तर्कला केवळ फक्त आय.ओ.डी.(भारत महासागरीय द्वि- ध्रुविता) ह्या प्रणालीचा चा टेकू हा आशावाद असला तरी, ज्याने गेले ३ महिने साथ दिली नाही, त्याच्याकडून सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? कारण अजुनही तो तटस्थवस्थेतच आहे.





8

खरिपाचे पिके जळणार

केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायत उभी पिके सध्या पाणी ताणावर असुन बिकट अवस्थेतून जात आहेत. तर काही जळण्याच्या मार्गांवर आहेत. शेतकरी तेथे रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.





9

रब्बी हंगामही जपून करा

"निसर्ग आहे, आणि काही तरी पाऊस होईलच, ह्या आशेवर, खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा ' श्री गणेशा ' करण्याच्या तयारीत आहेत. तेंव्हा आता रब्बी हंगामातही अश्या क्षेत्रात जपूनच पावले टाकावी."





10

भविष्यातील नियोजन गंभीरपणे करा

'शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी, तसेच सिंचन विभाग ह्यांनाही ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते."





माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.

Updated : 25 Aug 2023 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top