Home > मॅक्स किसान > शेतकरी शहरांची रसद तोडणार ?

शेतकरी शहरांची रसद तोडणार ?

शेतकरी शहरांची रसद तोडणार ?
X

राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज चौथा दिवस आहे. येत्या ७ तारखेपासून संप आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. १जून पासून सुरु झालेला हा संप १० जूनपर्यंत सुरु ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. संपाचा आज चौथा दिवस उजाडला तरी अजूनही सरकारकडून सकारात्मक पावलं उचलली जात नसल्याने, शेतकऱ्यांनी शहरांची रसद तोडण्याचा इशारा दिला आहे. काल नाशिक-पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाट्यावर हे आंदोलन करण्यात आलं आहे. शेतमालाला हमीभाव आणि दुधाला योग्यदर मिळावा या मागणीसाठी बळीराजानं संपाचं हत्यार उपसलं आहे.

काय काय होणार?

येत्या ७ तारखेपासून शहरांची भाजी, दुधाची रसद तोडणार असल्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नसल्याचा दावा किसान सभेच्या वतीनं करण्यात आला आहे. याचाच परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अनेक शहरांमधील बाजारांवर झाला आहे. पुढील दहा दिवस जर हा संप सुरु राहिला तर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत. दरम्यान, संपात सहभागी शेतकऱ्यांनी धान्यांची नासाडी करु नये अशी विनंती कृती समितीचे सदस्य एस बी नाना पाटील यांनी आंदोलनकांना केली आहे.

Updated : 4 Jun 2018 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top