Home > मॅक्स किसान > कोरडा दुष्काळ जाहीर करा

कोरडा दुष्काळ जाहीर करा

दुष्काळी परिस्थिती असल्याने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम भरावी द्यावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करा
X


पाऊसच झाला नसल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहेत. जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्‍यांनी पिक विमा काढला असून धुळे जिल्हयात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहीर करुन शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पाऊस नसल्याने धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळाची भीषणता जाणवू लागली आहे. सुरुवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कोरड्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्जाने पैसे घेवून शेतकर्‍यांनी मशागत केली, पेरणी केली काही ठिकाणी पिके जेमतेम जमिनीबाहेर आले. मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली तर तीच पिके करपू लागली आहेत. जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात पाऊसच नसल्याने कपाशी, बाजरी, ज्वारी, भूईमुग, तूर, उडीद, मूग, कांदा यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थातच खरीप हंगाम हातचा गेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आवाहना नुसार शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. दुष्काळीसदृश्य परिस्थिती आणि मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शासनाने विमा कंपनीला शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ देण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे. 25 टक्के अग्रीम रक्कम दिल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळाणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.


Updated : 29 Aug 2023 2:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top