दुबार पेरणीने उत्पन्न घटणार, जबाबदार कोण? डॉ. सतीश करंडे
Max Maharashtra | 4 July 2020 4:55 PM GMT
X
X
यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना तर तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. सरकारच्या वतीनं आता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली म्हणून काही मदत करण्यात येईल. असं सांगण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांवर आलेल्या दुबार पेरणी च्या संकटामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आपल्या देशातील शेती ही हवामान आधारीत शेती आहे. एकदा पिकाचा मोसम निघून गेला की, पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. त्यामुळं ठराविक कालावधीत ठराविक पीक घेणं गरजेचं ठरतं. त्यातच आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यानं खरीप हंगामातील पिकाचं उत्पन्न घटणार आहे का? या संदर्भात शेती तज्ञ डॉ. सतीश करंडे यांनी केलेलं विश्लेषण
Updated : 4 July 2020 4:55 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire