कृषी कायद्यांविरोधातला लढा आणखी तीव्र, मुंबईतही होणार आंदोलन
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Jan 2021 12:24 PM GMT
X
X
कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसंच आपला लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता किसान अलायन्स मोर्चाद्वारे 16 जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अलायन्सतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत मेधा पाटकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, फिरोज मिठीबोरिवाला असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Updated : 14 Jan 2021 12:24 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire