Home > मॅक्स ब्लॉग्ज > Kalaram Satyagraha : कशासाठी होता नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह?

Kalaram Satyagraha : कशासाठी होता नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह?

नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा आणि पूजा अर्चा करता यावी म्हणून होता का? सत्याग्रहाचा उद्देश काय होता? बाबासाहेबांनी भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात काय सांगितलं ? वाचा मुकुल निकाळजे यांचा लेख

Kalaram Satyagraha : कशासाठी होता नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह?
X

Kalaram Temple Satyagraha 1930 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला. तो सत्याग्रह पाच वर्षांपेक्षा जास्त काळ चालला परंतु मंदिर प्रवेश झाला नाही. शेवटी 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह मागे घेतल्याचे जाहीर करून येवले येथे "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी ऐतिहासिक गर्जना करीत हिंदू धर्माचा आपण त्याग करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. हा मंदिर प्रवेश सत्याग्रह मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मुळीच नव्हता, तसेच मंदिर प्रवेशाने समान अधिकार मिळतील असेही बाबासाहेबांना वाटत नव्हते. तर हा मंदिर प्रवेश त्या काळच्या तमाम अस्पृश्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होता की ते ज्या धर्माची आराधना करता त्या धर्मात त्यांचे स्थान काय आहे. हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात असताना बाबासाहेब या आंदोलनातून माघार घेण्याचा विचार करत असताना त्यांनी आपले सहकारी भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हंटले :

"I did not launch the temple entry movement because I wanted the Depressed Classes to become worshippers of idols which they were prevented from worshipping or because I believed that temple entry would make them equal members in and an integral part of the Hindu Society. So far as this aspect of the case is concerned I would advise the Depressed Classes to insist upon a complete overhauling of Hindu Society and Hindu theology before they consent to become an integral part of Hindu Society. I started temple entry Satyagrha only because I felt that was the best way of energising the Depressed Classes and making them conscious of their position. As I believe I have achieved that purpose I have no more use for temple entry. I want the Depressed Classes to concentrate their energy and resources on politics and education and I hope that they will realise the importance of both."

- Dr. Babasaheb Ambedkar,

(Dr. B.A.W.S, Vol. 17 part 1, page no. 202)

अर्थात: ज्या प्रतिमांच्या पूजनापासून दलित वर्गाला रोखले गेले आहे त्यांचे पूजन त्यांना करता यावे म्हणून मी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केलेली नाही किंवा मंदिर प्रवेश केल्याने त्यांना हिंदू समाजाचे समान सदस्य व एकात्म घटक समजल्या जाईल असेही मला वाटत नाही. त्या पुढे याबाबतीत मी दलित वर्गाला सल्ला देईल की ते तुम्हाला हिंदू समाजाचा एकात्म घटक म्हणून संमती देण्याच्या आधीच तुम्ही हिंदू समाज आणि हिंदू धर्मशास्त्रांना मागे टाकण्याचा आग्रह धरा. मी मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला कारण मला वाटते की पददलित समाजात चेतना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना ठरवून दिलेल्या जागेची त्यांना जाणीव करून देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. तो उद्देश मी साध्य केला आहे असे मी मानतो हा मंदिर प्रवेश सत्याग्रह आता माझ्या काही उपयोगाचा नाही. दलित वर्गाने त्यांची ऊर्जा आणि साधने राजकारण आणि शिक्षणात खर्ची घालण्याकडे लक्ष द्यावे आणि मला आशा आहे की त्यांना या दोन गोष्टींच्या महत्त्वाची जाणीव होईल.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यात बाबासाहेब स्पष्ट करत आहेत की मंदिरात प्रवेश मिळावा आणि पूजा अर्चा करता यावी म्हणून त्यांचा सत्याग्रह नव्हताच. तर दलितांना हिंदू धर्मात ठरवून दिलेल्या जागेची त्यांच्यात जाणीव व्हावी. त्यांनी हिंदू समाज आणि हिंदू धर्मशास्त्र यांना मागे टाकण्याची मानसिक तयारी करावी हा बाबासाहेबांचा यात उद्देश होता.

Kalaram Satyagraha, Nashik, Kalaram Temple Satyagraha 1930, 2 March 1930 historical event, Dr Babasaheb Ambedkar movement, Temple Entry Movement India, Dalit rights movement history, Ambedkar Yeola declaration 1935, I will not die as a Hindu speech, Dalit awakening movement, Ambedkar social revolution

Updated : 4 March 2026 2:50 PM IST
Next Story
Share it
Top