Home > मॅक्स ब्लॉग्ज > पुरंदरे कोण होते ? पुरुषोत्तम खेडेकर

पुरंदरे कोण होते ? पुरुषोत्तम खेडेकर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कांदबरीकार ब.मो. पुरंदरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा उघडला आहे. चुकीच्या पध्दतीने शिवचरीत्र मांडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ब.मो. पुरंदरे कोण होते.. या कथानकाचा उलगडा केला आहे.. मराठा महासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी...

पुरंदरे कोण होते ? पुरुषोत्तम खेडेकर
X

पुरंदरे मुळातच शिवप्रेमी वा शिवभक्त नव्हते . तर ते पहिले बाजीराव पेशवे प्रेमी होते . खाष्ट ब्राम्हण वादी होते . त्यासाठी कारण पहिल्या बाजीराव पेशवे यांनी केलेल्या विजयी लढाया पेक्षा ते ब्राह्मण होते हेच खरे होते . त्या निमित्ताने पुरंदरे अगदीच वयाच्या सतराव्या वर्षी ब्राह्मण सभांमधून पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या कथा सांगू लागले . पुढे गावोगावी ब्राह्मण समुदायात पुरंदरे व्याख्यान देण्यासाठी फिरत होते . त्यावेळी ते साधारण पाच सहा रुपये मिळावेत अशी मागणी करत होते . परंतू पैसे जमत नव्हते . तर प्रेक्षक संख्या कमी व फक्त म्हातारे ब्राह्मणच असायचे .

मुळातच ब मो पुरंदरेना लाभलेल्या जन्मजात वक्तृत्वातून त्यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी सुरुवात केली होती . पहिले बाजीराव पेशवे हेच खरे मराठेशाहीच्या वाढीसाठी लढलेले एकमेव हिरो आहेत असे पुरंदरे सांगत . असे करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दुय्यम होते ही पुरंदरेंनी मांडणी केली होती . त्या निमित्ताने विदर्भ विभागातील गावोगावी फिरून व्याख्याने दिले होते . वय साधारण पंचवीस वर्षे असावे .

पुरंदरेंच्या ओघवत्या शैलीतील बाजीराव वरील आख्यान एकदा आर एस एस चे गोळवलकर गुरुजी यांनी ऐकले . त्यांनी पुरंदरेंना बोलावून घेतले व स्पष्टपणे व्यवहारिक सूचना केल्या . त्यातील प्रमुख अशी होती -- " तू मरेपर्यंत व जन्मभर पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या बाबतीत कितीही व्याख्याने दिली तरी तूला काही मिळणार नाही . त्यापेक्षा तू तुझ्या कौशल्यांचा वापर करून समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राह्मणी इतिहास सांगणे . तसे केले तर लोक तूला डोक्यावर घेऊन मिरवतील . आर एस एस चे सर्व कार्यकर्ते तूला मदत करतील . "" ... अशी पुरंदरेंची शिवचरित्र समजून घेण्याची सुरुवात झाली . आणि त्यांनी पहिले बाजीराव पेशवे सोडून दिले . शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण व विकृतीकरण सुरू केले . त्यावर गोळवलकर गुरुजींनी शिक्कामोर्तब केले .

१९५३ दरम्यान तिकिट लावून पुरंदरेंचे आठ दिवसांचे व्याख्यान यवतमाळ येथे झाले . तिकिट लावून व्याख्यान आयोजित करावे असे गोळवलकर गुरुजी यांनी सांगितले होते . त्यामुळे आर एस एस चे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले होते . जिकडे-तिकडे उदोउदो झाला . हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर पुरंदरे नागपूर येथील आर एस एस च्या कार्यालयात राहिले . सात आठ वर्षे नागपूर येथे राहिले . आर एस एस च्या मुशीत तयार झाले . पूर्ण तयारीनिशी शिवशाहीर म्हणून बाहेर पडले . छत्रपती शिवाजी महाराज व जनसामान्य बहुजन हिंदू समाज यांच्यातील भावनिक नाते प्रभावीपणे वापरून समाजात हिंदू विरुद्ध मुस्लिम ख्रिश्चन वातावरण तयार करणे सुरू केले . शालेय शिक्षणातून तसेच वातावरण निर्माण केले जाऊ लागले . कॉंग्रेसचे मंत्री ही चाल समजू शकले नाही .

पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरापायी सर्व राजकीय पक्षातील बहुजन नेत्यांनी पुरंदरेंना पूर्ण ताकदीनिशी आर्थिक मदत दिली . करोडो रुपये उपलब्ध करून दिले . महाराष्ट्र शासनाने करोडो रुपयांची विशेष खैरात वाटली . अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी आर एस एस चे कार्यकर्ते एकनाथ रानडे यांनी कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंदांचे शिल्प उभारले होते . विवेकानंदांचे ब्राह्मणीकरण यशस्वी झाले . त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी आर्थिक मदत दिली होती .

पुरंदरे एकमेव व अंतीम शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या कथा सांगणारी व्यक्ती ही प्रतिमा तयार झाली. १९७४ मध्ये त्रिशताब्दी शिव राज्याभिषेक सोहळा निमित्ताने राजमाता सुमित्रा राजे भोसले सातारा यांनी पुरंदरेंना एका अर्थी लॉंच केले होते . त्यामुळे राज्यातील कुणबी मराठा बहुजन उद्दोजक , राज्यकर्ते , श्रीमंत व्यापारी यांनी पुरंदरेंना सर्वच सहकार्य केले . कुणबी मराठा बहुजन समाजातील मुले-मुली महानाट्यात फुकट काम करत होते . हीच पध्दत पुरंदरेंच्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत चालू राहिली . नंतरच्या काळात पुरंदरेंनी फुकट बोलणे पूर्णपणे बंद केले होते .... छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द उच्चारण्यासाठीही पुरंदरे पैसे घेत होते . या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा पुरंदरेंना भरण्यापूर्वी एकदा तरी खरे शिवचरित्र लोकांना सांगा , असे टोमणे मारलेले होते . हे पवार साहेब , उध्दव व राज ठाकरे यांना माहित आहे . पण त्यांची गोची झाली आहे .

पण सन २००४ मध्ये जेम्स लेन प्रकरण वेळी पुरंदरेंचे बेगडी शिवप्रेम उघडे नागडे झाले ... नि तोपर्यंत जनसामान्यांच्या मनावर खोलवर बिंबवले गेलेले पुरंदरे शिवद्रोही असल्याचे सिद्ध झाले ...

ब मो पुरंदरे हे पूर्णकालीन ब्राह्मणी वर्चस्वाला टिकविण्यासाठी आर एस एस चे कार्यकर्ते म्हणूनच काम करत होते . हे समजायला बराच वेळ लागला ... युवा पिढीने खोलवर जाऊन माहिती घेऊन ठरवावे ..

या निमित्ताने माझी सर्व कुणबी मराठा बहुजन समाजातील लोकांना व राजकीय नेत्यांना नम्र विनंती आहे की कृपया आपल्यातील गुणी मुले-मुली निवडून त्यांना मोठे करा . असे युवा संशोधक कलाकार अभ्यासक वक्ते अभिनेते लेखक अशा सर्वच क्षेत्रातील मुले-मुली तयार करून समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी उपयोग करा . तुमच्या आजूबाजूला दररोज वावरणारे अनेक पुरंदरे दूर करा . सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय सत्ता हस्तगत करणे शक्य आहे याची खात्री बाळगावी .

पुरुषोत्तम खेडेकर चिखली .

१६-११-२०२१ .

Updated : 2 May 2022 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top