Home > मॅक्स ब्लॉग्ज > कसबा : गृहीत राजकारणाला धक्का: डॉ.बाळासाहेब पवार

कसबा : गृहीत राजकारणाला धक्का: डॉ.बाळासाहेब पवार

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच क्षेत्रांमध्ये राजकीय चर्चा सुरू आहे. या निवडणूक निकालाने राज्याचे राजकीय संदर्भतील काय नेमकं या निवडणुकीत झालं ? आणि काय भविष्यातील राजकीय आखाडे असतील याचे विश्लेषण केलं आहे डॉ. बाळासाहेब पवार यांनी...

कसबा : गृहीत राजकारणाला धक्का: डॉ.बाळासाहेब पवार
X

कसबा व चिंचवड पोट निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या दृष्टीने विचार करायला लावणारी ठरली आहे . राज्यातील अभूतपूर्व सत्तांतर व त्याचे राज्यात जनतेने कसा प्रतिसाद दिला याची चाचणी घेणारी ही निवडणूक आहे . तशी ती शिक्षक व पदवीधर निवडणुकीत शिक्षित ,हुशार व कर्मचारी मतदारांनी सरकार विरुद्ध कौल देत आपली नाराजी व्यक्त केलीच आहे.परंतु त्या निवडणुकीला फार गंभीर्याने घेतले नाही . पण विधानसभा पोट निवडणूक मात्र अनेक अर्थाने राजकीय दिशा देणारी आहे.

पोट निवडणुका नेत्यांच्या निधना मुळे होत होत्या . त्यात सहनुभूती महत्वाचा घटक असतो . चिंचवड पोट निवडणुकीत ते जाणवले . परंतु कसबा पोट निवडणुकीत मात्र भाजपाला अतिआत्मविश्वास नडला . त्या पेक्षा ही मतदारांना गृहीत धरणे महागात पडले . कसबा मध्ये कोण निवडून येतो हे अजिबात महत्वाचे नव्हते तर शिंदे -फडणवीस सरकारला पदवीधर व शिक्षका नंतर शहरी मतदार कसा प्रतिसाद देतो हे ठरवणारी ही निवडणूक होती त्यात भाजपाला अपयश आले . हा राज्याच्या नेतृत्वा साठी इशारा आहे. कारण मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री स्थानिक मंत्री सत्ता सर्व राबवून सुद्धा इथे विजय मिळवता आला नाही .

या मतदार संघात ब्राम्हण बहुल व हिंदुत्ववादी मतदार असल्याचा समज माध्यमाने निर्माण केला होता . पण वस्तू स्थिती तशी नाही . या मतदार संघात ब्राम्हण , वेश्या वस्ती, गुन्हेगारीच्या घटने चा केंद्रबिंदू असणारी वस्ती असा हा मतदारसंघ आहे .

मुख्य मुद्दा भाजपा कडे होता हिंदुत्व तोच इथे मतदारांनी धुडकवला आहे . अतिशय उच्च वर्गा बरोबरच गुन्हेगारी विश्वपण विरोधात गेले तर बुधवारात पण विरोध झाला हे लक्षात घेता . भाजपने ब्राम्हण मतदार गृहीत धरणे चुक ठरले तर तिसरे ब्राम्हण महासघाचे उमेदवार आपले अनामत पण वाचू शकले नाहीत . म्हणजे ब्राम्हण मतदार हा फक्त हिंदुत्व या मुद्द्यावर आंधळे पणाने मतदान करतो किंवा जात म्हणून मतदान करतो असा समज धुडकावून लावला आहे.

खरे तर काँग्रेस स्वातंत्र्य पूर्व काळा पासून हिंदूंचा व पुण्यात ब्राम्हणांचा पक्ष होता . काँग्रेस चे सर्वाधिक अध्यक्ष हे ब्राम्हण होते नेहरू ते गांधी आज ही ब्राम्हण नेतृत्व आहे . कॉग्रेस चे बहुतांश नेते हे ब्राम्हण किंवा धर्मानतरित् ब्राम्हण परिवारातील आहेत . पुण्याचा विचार करता धनंजयरावं गाडगीळ विठ्ठलरावं गाडगीळ जयंतरावं टिळक हे नेते कॉग्रेसचे नेते होते . म्हणजे ब्राम्हण समाज पूर्ण पणे कॉग्रेस विरोधी मानने चुकीचे ठरते . वरील नेते फक्त स्थानिक नेते नव्हते तर देश व राज्य पातळीवर त्यांनी दीर्घ काळ काँग्रेस चे नेतृत्व केले आहे . खरे पाहता जेव्हा कॉग्रेस सत्तेत होती तेव्हा सर्वाधिक सत्ता स्थाने ब्राम्हण वर्गा कडेच राहिली व भाजपा सत्तेत असताना तुलनात्मक दृष्ट्या ती संख्या कमी आहे .त्यामुळे कसबा परत कॉग्रेस कडे गेला याचा एक अर्थ ब्राम्हण मतदार परत कॉग्रेस कडे जाऊ शकतो एव्हढाच घेता येईल . जाईलच असे काही

.रामजन्मभूमी प्रकरणा पासून जे धार्मिक ध्रुवीकरण झाले त्या नंतर हिंदू ना मुस्लिमांची भीती दाखवण्यात आली . एकीकडे मुस्लिम अस्वस्थ केला तेव्हडाच ब्राम्हण वर्ग ही अस्वस्थ करून भाजपने आपल्या बरोबर फरफटत् नेहला हे नक्की व त्याला गृहीत धरले . फार मोठा कालखंड कॉग्रेस् मुस्लिमाना गृहीत धरून चालली पण जेव्हा पर्याय मिळाला तेव्हा मुस्लिम कॉग्रेस पासून दूर गेले . असच काहीसा प्रकार ब्राम्हण मतदारा बद्दल होताना दिसतो आहे

मुळात रामजन्मभूमी बाबत कॉग्रेसने जे केले ते भाजप ने केले नाही . राजीव गांधींनी पहिल्यांदा मंदिराचे कुलूप उघडले . नरसिहराव यांनी बाबरी ढाचा पाडताना बघायची भूमिका घेत अप्रत्यक्ष सहकार्य केले परतू उघड भूमिका घेतली नाही . हे कॉग्रेस ला सांगता आले नाही त्यामुळे हिंदू मत भाजप कडे वळले या ध्रुवीकरणाला तडे जाऊ लागले आहेत. . जर योग्य पक्ष पर्याय आल्यास ब्राम्हणवर्ग भाजपा पासून दूर होऊ शकतो हे या निवडणुकीत दिसून आले .

रा.स्व.संघाने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आपल्या स्वयसेवकांना चिंचवड मध्ये सक्रिय केले परंतु कसब्यात मात्र भूमिका घेतली नाही . भाजप मध्ये संघा व्यतिरिक्त आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे ते मात्र प्रचारात होते . संघाला ब्राम्हण चेहरा व विचारधारा आहे . परंतु गेल्या पंधरा विस वर्षात मात्र संघात ब्राम्हणेतरांची ची संख्या प्रचंड वाढली आहे . तिथे ही आता ब्राम्हण स्वयनसेवकांची कुचंबणा होताना दिसते आहे . मोदी -शहा यांनी ज्या पद्धतीने संघाची वरिष्ट पातळीवर कोंडी केली आहे ती कोंडी जर फुटली नाही तर कॉग्रेसला मदत करण्याचा पर्याय संघा ला आहे .त्याची सुरुवात कसब्यातून झाली असे म्हणता येईल .

भाजपा च्या संदर्भात हा विजय महत्वाचा होता आठ्ठावीस वर्षा नंतर त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे . तोही आपण कायम गृहीत धरलेल्या ब्राम्हण मतदारा नी हा पराभव केला आहे . कोणत्याही प्रभागात किंवा मतमोजणी फेरीत भाजप लीड घेऊ शकला नाही . हा सर्वार्थाने पराभव आहे हे नक्की. तसेच ब्राम्हण उमेदवार दिला नाही म्हणून काँग्रेस जिंकली असे नाही . किंवा ब्राम्हण मते ब्राम्हण उमेदवाराला मिळाली असे ही नाही तर मतदान कमी होने हाच इशारा होता . राग न दाखवता राग काढणे हा प्रकार तिथे दिसला व सत्तधारी लोकांनी प्रचाराचा जो अतिरेक केला तोही रुचला नाही . असेही म्हणता येईल.

ब्राम्हण मतदारांनी आणखी एक खूप मोठी काळजी घेतली . सत्तेत भाजपा आल्या पासून मुस्लिम जसा बाजूला टाकला जातो तसाच मुख्य प्रवाहत मुठ भर ब्राम्हण नेत्या मुळे संपूर्ण समाजाला संशयाने पाहिले जाते . तसेही होऊ दिले नाही . एक तर मतदान केले नाही व केले तर ते ब्राम्हण महासघाच्या उमेदवाराला केले नाही . आम्ही एव्हडे संकुचित नाही हे पण यातून दाखवून दिले अत्यल्प मते या उमेदवाराला पडली व ते जे संपूर्ण समाजाचे ठेकेदार बनले होते तो ठेका काढून घेतला . समस्त ब्राम्हण समाजाचे नेते थेट जमिनीवर आपटले . इथून पुढे त्यांना समाजाची अधिकृत भूमिका मांडून समाजाला अडचणीत आणण्याचा प्रकार करता येणार नाही . हे ही या निवडणुकीत साध्य झाले .

भाजपा नेतृत्वाला ही निवडणूक जय पराजयाच्या पलीकडे विचार करायला लावणारी आहे . परंतु ते विचार करतील व वायफळ वक्तव्य कमी करतील असे वाटत नाही .गिरीश बापट स्थानिक होते ते पुण्यात मान्य होते पण बाहेरील नेतृत्व थोपवता येणार नाही . चंद्रकांत पाटील यांना पुणेकर पुन्हा स्वीकारणार नाहीत हे ही स्पस्ट झाले . व राज्याच्या नेतृत्वाने त्यांना पुढे करून पुन्हा त्यांच्या मर्यादा स्पस्ट केल्या आहेत का ?

या निवडणुकीत पैश्याचा वापर झाला आता कोणतीही निवडणूक पैशे वाल्याचीच झाली आहे . परंतु थेट मतदारांना पैसे वाटप झाले ही मोठी चर्चा होती पण ही चर्चा सुद्धा या मतदारांनी फोल ठरवली . करण पैसे घेतले तर किमान मतदान करावे लागते कोणाला केले हा भाग वेगळा परतू इथला मतदार विकला नाही हे सुद्धा या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले.

एकूणच कसब्यात ब्राम्हण ही जात म्हणून नव्हे तर त्यांना सरमिसळून गेलेला बहुजन हा सुद्धा तसाच विचार करणारा आहे त्यामुळे त्यांची टक्केवारी यांची टक्केवारी असे करता येणार नाही . तर सरसकट या विचारधारेच्या लोकांना भाजपाने गृहीत धरू नये असाच इशारा आज च्या निवडणुकीत दिला आहे असंच म्हणावे लागेल.

डॉ. बाळासाहेब पवार

(राजकीय व सामाजिक विषयाचे अभ्यासक)

Updated : 6 March 2023 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top