Home > मॅक्स ब्लॉग्ज > जागतिकीकरणाची तीन दशके

जागतिकीकरणाची तीन दशके

जागतिकीकरणाच्या तीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे अभ्यासक विकास मेश्राम यांनी..

जागतिकीकरणाची तीन दशके
X


गेल्या 30 वर्षात ज्यांनी बदललेला भारत पाहिला आहे,त्यांना जर 30 वर्षापूर्वी ची परिस्थितीची आत्ताच्या परीस्थिती ची तुलना होऊ शकत नाही.तसे बघायला गेले तर ते कबूल करतात की आजच्या भारताची कल्पना त्या काळात केली जाऊ शकत नव्हती. आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार जगातील 10 विकसीत अर्थव्यवस्थांमध्ये आहे. त्या अर्थव्यवस्थेचा आराखडा तयार करणे, पाया घालणे आणि आधारस्तंभ तयार करण्याचे , श्रेय तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना द्यावे लागेल. निःसंशयपणे त्यावेळी मनमोहनसिंग अर्थमंत्री होते. साहजिकच नरसिंह राव यांच्याकडे भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी भविष्यातील दृष्टी होती.

मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 रोजी अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ केला तेव्हा अर्थव्यवस्थेचे मूलगामी परिवर्तन घडविणारे कागदपत्र बाहेर येणार आहे याची कल्पनाही मोठ्या अर्थतज्ज्ञांना नव्हती. मनमोहनसिंग यांनी आपल्या भाषणातील दुसर्‍या परिच्छेदातून अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे वर्णन सुरू केले. ते म्हणाले की, राजकीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय बाजारात असंतुलन आणि आखाती देशातील संकटामुळे आमच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय बोझा वाढला . जून 1991 मध्ये आमच्याकडे केवळ 110 कोटी डॉलर्स एवढा परकीय चलन साठा होता, त्यातून केवळ 15 दिवसांची बिले भरणे शक्य होते. तीन वर्षांत चांगला पाऊस आणि उत्तम पीक उत्पादन असूनही सामान्य वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या. मनमोहन सिंग असेही म्हणाले की, अर्थव्यवस्थेचे संकट खूप गडद झाले असून . परवाना सिस्टममुळे गुंतवणूक क्षेत्रात खूप अडचणी येत होत्या हीच वेळ होती जेव्हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात बँक ऑफ इंग्लंडमध्ये 67 टन सोने गहाण ठेवले होते.

तथापि, अर्थसंकल्पाच्या एक महिना आधी 24 जून 1991 ते 24 जुलै 1991 या काळात राव आणि मनमोहन यांच्या जोडीने अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात नवीन अध्याय लिहिण्यास सुरवात केली. भारतीय रुपयाचे 20 टक्के अवमूल्यन झाले होते , नवीन व्यापार धोरण जाहीर झाले आणि 6 जुलै ते 18 जुलै या कालावधीत सुमारे 45 टन सोने तीन हप्त्यांमध्ये इंग्लंडला पाठविण्यात आले, त्यानंतर भारताला 4000 लाख डॉलर कर्ज मिळणार होते . अर्थसंकल्पानंतर त्याच दिवशी देशाचे नवीन औद्योगिक धोरण सादर केले गेले. अशाप्रकारे, जर आपण सखोलपणे पाहिले तर असे मानले पाहिजे की नरसिंह राव यांच्या मनात एक पूर्ण कल्पनाशक्ती होती, संकटेच्या काळातही त्यांनी मनमोहनसिंग यांच्यासमवेत धैर्याने या गोष्टी समोर आणल्या.

आज, अर्थव्यवस्थेतील संकट असूनही आणि विकासाची गती मंदावली असूनही, जगातील गुंतवणूकदारांसाठी भारत हा गुंतवणूकीसाठी सक्षम सकारात्मक देश अशी प्रतिमा जगभरात कायम आहे यांचे श्रेय नरसिंह राव , मनमोहन सिंग यांना जातो . ब्रिटीश येण्यापूर्वी भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश होता, तर जागतिक व्यापारामध्ये तिचा वाटा सर्वाधिक होता, तर त्यामागे आमची सहकारी सामाजिक व्यवस्था होती, ज्यामध्ये स्वतः आर्थिक धोरण समाविष्ट होते. ते पाडून इंग्रजांनी हळूहळू त्यांच्या स्वार्थानुसार आर्थिक रचना विकसित केली, जी आपल्या विवंचनेस कारणीभूत ठरली.

नरसिंह राव यांनी ती परिस्थिती अत्यंत कार्यक्षमतेने हाताळली आणि अमेरिकेसह पाश्चात्य देशांशी नवीन संबंध स्थापित झाले. याच्या आधारे, आज आपण आसियान, ईस्ट एशिया इकॉनॉमिक ग्रुप, जी -8, जी -20 इत्यादींमध्ये एक सन्माननीय स्थान बनवण्यास सक्षम आहोत.

विकास परसराम मेश्राम

[email protected]

Updated : 5 Aug 2021 2:33 AM GMT
Next Story
Share it
Top