भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीची चर्चा झाली होती का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 April 2022 11:39 AM GMT
X
X
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१७मध्ये भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन युती तयार करण्याचा प्रयत्न केला होता, असे शेलार यांनी म्हटले आहे. पण राष्ट्रवादीने शिवसेनेला विरोध केल्याने तेव्हा ती चर्चा फिस्कटली असा गौप्यस्फोट केला आहे. यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशीष शेलार यांनी एवढ्या उशिरा हा आरोप का केला, ते ५ वर्ष का गप्प होते, असा सवाल केला आहे. तर शिवसेनेनं हे सारे खोटे असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसने आशिष शेलार यांचा दावा हा देवेंद्र फडणवीस यांना खोटा ठरवणारा असल्याची टीका केला आहे.
Updated : 28 April 2022 11:39 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire