Home > Top News > कोणतंही पॅकेज जाहीर करणार नाही आणि कुणाला वाऱ्यावरही सोडणार नाही - उध्दव ठाकरे

कोणतंही पॅकेज जाहीर करणार नाही आणि कुणाला वाऱ्यावरही सोडणार नाही - उध्दव ठाकरे

कोणतंही पॅकेज जाहीर करणार नाही आणि कुणाला वाऱ्यावरही सोडणार नाही - उध्दव ठाकरे
X


सांगली – जुलैएो महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले आहे. सर्व पूरग्रस्त सरकारच्या मदतीच्य़ा पॅकेजची घोषणा करत आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीच्या पॅकेज संदर्भात मोठे विधान केले आहे. सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

"जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी काही जबाबदारी पार पाडावी लागेल ती जबाबदारी पार पाडू असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.


सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भिलवडी, ता- पलूस येथे आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ .विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनदादा कदम . आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील , आमदार अरूण लाड, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री भिलवडी येथे बोलताना म्हणाले की, " कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. शेती, घरेदारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू असून काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली तयारी हवी. नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली निवेदने द्या त्यांतील सूचनांचा नक्कीच विचार करू" असे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले.

Updated : 2 Aug 2021 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top