Home > Politics > Uddhav Thackeray resign : संजय राऊत यांच्या ट्वीटचा अर्थ काय?

Uddhav Thackeray resign : संजय राऊत यांच्या ट्वीटचा अर्थ काय?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. तर या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray resign : संजय राऊत यांच्या ट्वीटचा अर्थ काय?
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार अस्थिर झाले होते. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या चाचणीच्या आदेशाला स्थगती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर त्यानंतर आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करून शिवसेनेचे पक्षचिन्हाचा फोटो टाकला आहे. तर त्यावर जय महाराष्ट्र असे लिहीले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

संजय राऊत यांच्या ट्वीटचा अर्थ काय?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्या प्रवक्तेपदावर आक्षेप घेतला होता. तसंच संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगतले की, जर माझी अडचण असेल तर मी सोडतो असं म्हटलं होतं. तर त्यानंतर संजय राऊत यांनी पक्षचिन्ह ट्वीट करून जय महाराष्ट्र असं लिहीलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ट्वीटचा अर्थ ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक व्यंगचित्र ट्वीट केले आहे. त्या व्यंगचित्रातील व्यक्तीच्या पाठीला जखम दिसत आहे. तर संजय राऊत यांनी 'नेमकं हेच घडलं' असं लिहीले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची चर्चा आहे.पण यातून संजय राऊत यांना नेमकं काय सूचित करायचं आहे हा मात्र प्रश्न कायम आहे. कारण शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे हे ट्वीट शिंदे गटावर निशाणा आहे की भाजपच्या खेळीमुळे सरकार गेल्याने भाजपवर निशाणा आहे, हे मात्र अनुत्तरीत आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली आहे.

न्याय देवता का सन्मान होगा! फायर टेस्ट fire test अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जायंगे.. जय महाराष्ट्र! ,असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लोकशाहीचा न्यायपालिका हा स्तंभ कोसळून पडल्याचा फोटो संजय राऊत यांनी टाकला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत न्यायालयाच्या निकालावर टिपण्णी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपला राजीनामा जाहीर केला. यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मनोगतात काय सांगितले ते पाहा..

"मी आश्वस्त केले होतं जे सुरु केलंय ते सुरु राहील. आतापर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने...सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फ्लोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार, असं उध्दव ठाकरे म्हणाले.

त्यानंतर संजय राऊत यांनी रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर दुसरं ट्वीट केलं होतं. त्यामध्ये संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

शरद पवार यांचेही मानले आभार

संजय राऊत यांनी तिसरं ट्वीट केलं. त्यामध्ये म्हणाले की, मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!

तर त्यानंतर सकाळी एका ट्वीटमध्ये जय महाराष्ट्र तर दुसऱ्या ट्वीटमध्ये नेमकं हेच घडलं असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

Updated : 30 Jun 2022 4:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top