Home > Politics > कसब्याच्या पराभवाचे पक्ष आत्मचिंतन करणार

कसब्याच्या पराभवाचे पक्ष आत्मचिंतन करणार

पुणे जिल्ह्यात झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये भाजपला एक जागा गमावावी लागली आणि एका जागेवर विजय संपादन करता आला. कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचे पक्षाच्या पातळीवर आत्मचिंतन करणार असल्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. मुनगंटीवार आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.

कसब्याच्या पराभवाचे पक्ष आत्मचिंतन करणार
X

कसबा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) झालेल्या पराभवाचे पक्ष पातळीवर आत्मचिंतन करण्यात येईल, अशी माहिती वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. मुनगंटीवार आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. विजय झाला तर माजायचे नाही आणि हरलो तर लाजायचे नाही. ही आमची शिकवण आहे. विजयाचं विश्लेषण आणि पराभवाचं चिंतन याप्रमाणे पक्ष विचार करत आहे. चिंचवडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना लोकांनी नाकारले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनाचे मांडे खूप असतात, त्यांना उद्धव साहेब पंतप्रधान होतील असे वाटल होतं. त्यामुळे ते भाजपवर टीका करतात हे त्यांच्या मनाचे खेळ आहेत, अशी टिका ही मुनगंटीवार यांनी‌ केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि संजय राऊत यांच्या शिवतीर्थवरील सभेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यावर न्याय व्यवस्था चांगली आणि इतरवेळी लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात असते, हे चुकीचे आहे. असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला. वन विभागातील कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठिशी न घालता कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Updated : 3 March 2023 9:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top