खेलरत्नला भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल- सिंह
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Aug 2021 5:28 AM GMT
X
X
दरम्यान या नामकरणानंतर विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केल्याचे म्हटलं आहे. यातुनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचं काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे. तर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील मोदींच्या या निर्णयाला विरोध करत , नामांतराबद्दल आश्चर्य वाटलं नाही. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचं नाव बदलण्यात आलं तसंच या पुरस्कारालाही भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
Updated : 7 Aug 2021 5:28 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire