Home > Politics > मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला आहे का? देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला आहे का? देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला आहे का? देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
X

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये परिस्थितीत जैसे थे ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे का, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, याचा चुकीचा अर्थ काहींनी काढला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने केवळ दोन्ही बाजूंच्या आमदारांवर सुरू करण्यात आलेली अपात्रतेची कारवाईबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींना हे आदेश लागू होत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे लांबला होता, पण आता तो लवकरच केला जाईल अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे, त्यामुळे कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल, अशी भूमिकाही फडणवीस यांनी मांडली.


Updated : 20 July 2022 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top