तुम्हाला नुपूर व्हायचे आहे का? नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीस यांना सवाल
X
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेत्यांकडून आता शिवसेनेला चिमटे काढले जात आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या दरम्यान फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही पुण्यातील एका कार्यक्रमा दरम्यान या निकालावर भाष्य केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया देताना, "अब देवेंद्र अकेला नहीं है ना कभी था, उनके साथ पुरी कायनात हैं, हम सब भी है, आप लोग भी हैं" या पुढे प्रगतीचे राजकारण पुढे येईल टोमणेबाजी पुढे नाही येणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
अमृता फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले आहे. “ #शिवसेना मा.अमृता,गायिकेतुन भाजपा प्रवक्ता कधीपासुन झालात? राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात थेट जनता करत नाही! जनतेचा कौल म्हणाल तर पदवीघर,शिक्षक,देगलुर,कोल्हापुर या निवडणुकांत
@MaViAaghadi जिंकली हे लक्षात ठेवा. बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे कां?
#शिवसेना मा.अमृता,गायिकेतुन भाजपा प्रवक्ता कधीपासुन झालात?
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) June 11, २०२२ @fadnavis_amruta”
राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात थेट जनता करत नाही!
जनतेचा कौल म्हणाल तर
पदवीघर,शिक्षक,देगलुर,कोल्हापुर या निवडणुकांत @MaViAaghadi जिंकली हे लक्षात ठेवा.
बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे कां?@fadnavis_amruta
या शब्दात नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले आहे. दिपाली सय्यद, मनिषा कायंदे यांच्यासह नीलम गोऱ्हेंनीही भाजपला थेट उत्तर दिले आहे.






