Home > Politics > ''आम्ही म्हणतो कर्जमाफी, ते म्हणतात विराटने कसली बाउंड्री मारली'' राहुल गांधींची भाजपवर टीका..

''आम्ही म्हणतो कर्जमाफी, ते म्हणतात विराटने कसली बाउंड्री मारली'' राहुल गांधींची भाजपवर टीका..

आम्ही म्हणतो कर्जमाफी, ते म्हणतात विराटने कसली बाउंड्री मारली राहुल गांधींची भाजपवर टीका..
X

राहुल गांधी यांची आज इंदूरच्या राजबाडा येथे सभा झाली. या सभेत त्यांनी नोटबंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांची कर्जमाफी, जीएसटी अशा अनेक मुद्यांवरून सरकारवर टीका केली. सभे पूर्वी त्यांनी तत्पूर्वी त्यांनी माता अहिल्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मंचावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह, राज्य प्रभारी जेपी अग्रवाल, केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे काय होते पहा थोडक्यात...

राहुल गांधी सभा मुद्दे :

-राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बब्बर शेर म्हटले. या सभेत आज त्यांनी नोटबंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांची कर्जमाफी, जीएसटी अशा अनेक प्रश्नांवर

-भारत जोडो यात्रेला जवळपास 80 दिवस पूर्ण झाले आहेत. इंदूरने आज दाखवल्याप्रमाणे, आपण या प्रवासात एकटे चालत नाही, तर संपूर्ण भारतातील लोक या प्रवासात एकत्र चालत आहेत.

-इंदूरच्या रस्त्यांवर 8 तास फिरलो. मी 8 तास आजूबाजूला पाहिले. मला इथे कचरा दिसला नाही. त्याबद्दल इंदूरच्या जनतेचे आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आभार.

-लोकसभेत आम्ही अनेकदा मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांची कर्जमाफी असो, जीएसटी असो की शेतकर्‍यांसाठी काळे कायदे असो, आमचे माईक जादूने बंद केले जातात.

-आम्ही म्हणतो कर्जमाफी झाली पाहिजे, ते म्हणतात विराटने कसली बाउंड्री मारली

-रात्री टीव्ही पाहिला, चॅनल बदलले तर पहिल्यापासून पाचव्या क्रमांकावर मोदीजी, मग अमित शहा जी, कधी ऐश्वर्या राय, कधी अजय देवगण. शेतकऱ्याचा चेहरा, त्याचे फाटलेले हात टीव्हीवर दिसणार नाहीत.

-जे काम चिनी सैन्य करू शकले नाही ते नोटाबंदी आणि जीएसटीने करून दाखवले आहे.

-नोटाबंदी, जीएसटीचा शेतकऱ्याला फायदा झाला नाही. याचा फायदा फक्त दोन-तीन जणांना झाला आहे. आता देशभक्तीची, तिरंग्याची चर्चा आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

-छोटे व्यापारी आणि शेतकरी हा रोजगाराचा कणा आहे. हे लोक तरुणांना रोजगार देतात. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सरकारने छोट्या व्यापाऱ्यांचा रोख संपवला. म्हणजेच त्याचा गळा दाबला गेला. या दोन्ही धोरणांमुळे देश कमकुवत झाला.

-नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सरकारने छोट्या व्यावसायिकांची गळचेपी केली

-यूपीए सरकारच्या काळात गॅस सिलिंडरचा दर 400 रुपये होता, आज दर सांगण्यासाठी तिसऱ्या हाताची गरज आहे. पेट्रोलचा दर 50 रुपये होता, तो आज 107 रुपये आहे.

-ज्या सरकारने तुमचा आवाज ऐकला. त्या सरकारमधील लोकांना भाजपने विकत घेतले.

-इंदूरने या प्रवासाला आपले प्रेम आणि शक्ती दिली आहे. माझ्या चेहऱ्यावर थकवा दिसतोय का?

-आमचा प्लॅन असा होता की 7 सप्टेंबरला प्रवास सुरू होईल, त्याला 150 दिवस लागतील. मात्र आता जास्तीत जास्त 120 ते 130 दिवस लागतील. आम्ही दररोज 25 किमी चालत असतो. आम्ही दररोज हाफ मॅरेथॉन करतो. मी सकाळी 4 वाजता उठतो, रात्री 12 वाजता झोपतो. फक्त मीच नाही तर सर्व प्रवासी हे करतात. आम्ही तुमची शक्ती वापरत आहोत, आमची नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

-भारतातील सर्वात मोठे विमानतळ इंदूरमध्ये व्हावे, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही या देशाचे लॉजिस्टिक हब बनला आहात.

Updated : 27 Nov 2022 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top