Home > Politics > पंतप्रधानांच्या सुरक्षिततेत गंभीर तृटी? पंजाब सरकारची मोठी घोषणा…

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेत गंभीर तृटी? पंजाब सरकारची मोठी घोषणा…

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेत गंभीर तृटी? पंजाब सरकारची मोठी घोषणा…
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षितेत चूक झाली का? या संदर्भात पंजाब सरकारने उच्च स्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. या चौकशी समितीत निवृत्त न्यायाधीशांसह गृहखात्यांच्या सचिवांचा समावेश असून ही समिती तीन दिवसात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

काय सर्व प्रकरण?

तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ५ जानेवारी ला पंजाब दौऱ्यावर होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंजाब दौरा रद्द करून राजधानी दिल्ली येथे परतावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिरोजपुर येथे मोठी सभा होणार होती. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 42 हजार 750 कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन करणार होते. मात्र, ही सभा रद्द करण्याची वेळ भाजपवर आली.

पंतप्रधान पंजाब मधील बठींडा येथे पोहोचले. मात्र, या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी हवामान खराब असल्याने मोदी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करणं अशक्य होतं. मोदींना त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट द्यायची होती. मात्र, हवामान खराब असल्याने त्यांनी हेलिकॉप्टर ऐवजी सडक मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने जात असताना शहीद स्मारकापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० किलोमीटर अंतरावर एका फ्लाय ओव्हर वर २० मिनिटे थांबावं लागलं.

तीन कृषी कायद्या दरम्यान पंजाब मधील शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेतले असले तरी या ठिकाणी मोदी यांचा शेतकऱ्यांनी विरोध सुरूच ठेवला आहे. त्यामुळे मोदींना या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, मोदींना एका फ्लाय ओव्हर वर २० मिनिटे थांबावं लागल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात आणि सुरक्षेसंदर्भात पंजाब सरकार कडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात पंजाब सरकार कडून स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच, या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर पंजाब सरकारने एका निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केला असून पंतप्रधानांचा मार्ग रोखला गेला असतांनाही मुख्यमंत्री चन्नी यांनी फोन घेतला नाही असा आरोप केला आहे. तर, चन्नी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भठींडा ते फिरोजपुर हवाई मार्गाने जाणार होते. त्यांचा रस्त्याने जाण्याचा नियोजित दौरा नव्हता .

ऐन वेळेस, त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून रस्त्याने जाण्याचा मार्ग निवडला. त्यांनी पंजाब सरकारला अगोदर कळवायला हवं होतं. आम्ही VIP मुमेंट साठी पर्यायी मार्गाची निवड केली असती. तसेच, फिरोजपुर रॅलीला फक्त ७०० लोक असल्याने ही रॅली कॅन्सल करण्याची वेळ भाजपवर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये आता राजकीय वादाला सुरूवात झाली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षितेत त्रुटी? मुद्दा सर्वोच्च न्यायालयात

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर आज हा मुद्दा एका याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे. यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

कोणी काय म्हटलं?

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी…

पंतप्रधानांच्या जीवाला धोका असता तर आधी मी माझं रक्त सांडले असतं

आम्ही आमच्या पंतप्रधानांवर कुठलेही संकट येऊ देणार नाही

यात बिनकामाचं राजकारण करू नये

सुरक्षेतत कुठलीही त्रुटी नव्हती

रस्त्याने जाण्याचा निर्णय केंद्रीय यंत्रणांनीच घेतला

रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

आम्ही देशाचे दोन पंतप्रधान देशासाठी गमावले आहेत.. पंतप्रधानांच्या सुरक्षेचं महत्व काय याची जाण काँग्रेसला आहे. पण शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आलेल्या अपयशाचं खापर भाजपने काँग्रेसवर फोडू नये.

स्मृती इराणी…

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक

काँग्रेसचे रक्तरंजित मनसुबे अयशस्वी झाले

काँग्रेसचे नेते आनंदात का आहेत? इराणी यांचे सवाल…

पंतप्रधानांच्या ताफ्याचा मार्ग आंदोलकांपर्यंत कोणी पोहोचू दिला?


Updated : 6 Jan 2022 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top