Home > Politics > नारायण राणे यांची सत्ताबदलाबाबत तारीख पे तारीख, राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

नारायण राणे यांची सत्ताबदलाबाबत तारीख पे तारीख, राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

नारायण राणे यांची सत्ताबदलाबाबत तारीख पे तारीख, राष्ट्रवादीने उडवली खिल्ली
X

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा नवा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. नारायण राणे यांनी मार्च ही जास्तीची मुदत दिली त्याबद्दल त्यांचे खास आभार असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत, मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे आभार मानले जयंत पाटील यांनी मानले आहेत.

नारायण राणे यांनी आघाडी सरकार मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकीताची खिल्ली उडवली आहे. आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच - सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे, हे मी समजू शकतो असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे. पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे आता भाकीत करु करुन थकले आहेत, त्यामुळे त्यांनी नारायण राणेंसारखे नवे प्लेअर उतरवले आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Updated : 26 Nov 2021 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top